शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:54 IST

जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क 

पालघर: सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव होत आहेत, मात्र माझ्यासमोर चिंता आहे ती स्थलांतरित कातकरी कुटुंबातील शाळाबाह्य मुलांची. स्थलांतर करणारी जी आमची मुले आहेत, त्यांचे शिक्षण हे मोठे चॅलेंज आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात शाळाही सुरू केल्या असून, जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्यासाठी सुरू केलेली ‘धरती आबा’ लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यात मनोर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.

वाढवणमधील रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देणार पालघरमध्ये वाढवण बंदर उभे राहिल्यानंतर जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन होणार आहे. बंदरामुळे देश भविष्यात सागरी शक्ती म्हणून पुढे येणार आहे. यामुळे जागतिक व्यापारात भारताची भागीदारी वाढेल. स्थानिक तरुणांना येथील रोजगारात प्राधान्य देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.    वनपट्टे १५ ऑगस्टपर्यंत निकाली काढा जिल्ह्यात आजही ७ ते ८ हजार वनपट्टे वाटप करण्याचे काम शिल्लक आहे. हे वनपट्टे १५ ऑगस्टपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

सुसंवाद ही समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली सोमवारी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील दुर्वेस शाळेत सोमवारी उपस्थित राहून येथील विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करून त्यांचे औपचारिक स्वागत केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांच्यातील सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई