शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सक्तीने बालविवाह लावणाऱ्यांना मामुली शिक्षा

By admin | Updated: May 8, 2015 01:54 IST

एका १५ वर्षांच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यातून पळवून नेऊन तिचा बळजबरीने बालविवाह लावणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील

मुंबई : एका १५ वर्षांच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यातून पळवून नेऊन तिचा बळजबरीने बालविवाह लावणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील अंदोशी गावातील जात पंचायतीच्या आठ सदस्यांच्या दोषित्वावर २० वर्षांनी शिक्कामोर्तब करताना उच्च न्यायालयाने दयाबुद्धी दाखवून त्यांना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची मामुली शिक्षा दिली आहे.न्या. मृदुला भाटकर यांनी अलीकडेच दिलेल्या या निकालाने अंदोशी गावातील विलास अर्जुन पाटील, परशुराम गौरु शेळके, जगन्नाथ बाळू चेरकर, अनंत नथुराम ठाकूर, भास्कर लक्ष्मण पाटील, हरिश्चंद्र रामा शेळके आणि हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील तसेच चाळ नाका येथील रघुनाथ पांडुरंग पिटकर या आरोपींना दिलासा मिळाला आहे. अशोक गौरु धुमाळ या आणखी एका आरोपीचे अपिल प्रलंबित असताना निधन झाले होते.रायगड सत्र न्यायालयाने या सर्वांना अपहरण, खंडणी वसुली आणि बालविवाह लावणे इत्यादी गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून दोन वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली होती. न्या. भाटकर यांनी मात्र त्यांना जास्तीत जास्त एक महिन्याच्या सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा दिली. त्यावेळी जेमतेम सव्वा पंधरा वर्षाची असलेली अंदोशी गावातील दीपा नावाची मुलगी मुंबईत मोलकरीण म्हणून काम करून पोट भरायची. गावी आली की ती गावातील मधुकर नावाच्या इसमाला भेटायची, त्याच्याशी बोलायची. गावातील गावकी चालविणाऱ्या वरील आरोपींना हे पसंत नव्हते. त्यांनी दिपा व मधुकरच्या आयांना त्यांचे लग्न लावून देण्यास सांगितले. पण दोघेही अल्पवयीन असल्याने आयांनी तसे करण्यास नकार दिला. गावकीचा दंडक मोडला म्हणून आरोपींनी या दोन्ही आयांकडून प्रत्येकी ७५० रुपये दंड सक्तीने वसूल केला. त्यांनी दीपाला तिच्या आईपासून जबरदस्तीने काढून घेऊन ९ जानेवारी ९४ रोजी तिचा विवाह आरोपींनी मधुकरशी लावून दिला.आम्ही विवाह लावला नाही, फक्त साखरपुडा केला. दंडही सक्तीने वसूल केला नाही. दीपा त्यावेळी अल्पवयीन होती याला कोणताही ठोस पुरावा नाही. मुळात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये खटला चालविण्याचा सत्र न्यायालयास अधिकारच नाही, असे अनेक मुद्दे आरोपींनी अपिलात मांडले. परंतु न्या. भाटकर यांनी ते फेटाळले व विवाह ही प्रत्येकाची खासगी व मर्जीची बाब असून त्याबाबतीत गावकी रुढी-परंपरांच्या आड कोणतीही सक्ती करू शकत नाही, असा निर्वाळा दिला.या अपिलांच्या सुनावणीत आरोपींसाठी अ‍ॅड. एस. मलिक यांनी तर सरकारसाठी अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेठ यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)