शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

सक्तीने बालविवाह लावणाऱ्यांना मामुली शिक्षा

By admin | Updated: May 8, 2015 01:54 IST

एका १५ वर्षांच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यातून पळवून नेऊन तिचा बळजबरीने बालविवाह लावणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील

मुंबई : एका १५ वर्षांच्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यातून पळवून नेऊन तिचा बळजबरीने बालविवाह लावणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील अंदोशी गावातील जात पंचायतीच्या आठ सदस्यांच्या दोषित्वावर २० वर्षांनी शिक्कामोर्तब करताना उच्च न्यायालयाने दयाबुद्धी दाखवून त्यांना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची मामुली शिक्षा दिली आहे.न्या. मृदुला भाटकर यांनी अलीकडेच दिलेल्या या निकालाने अंदोशी गावातील विलास अर्जुन पाटील, परशुराम गौरु शेळके, जगन्नाथ बाळू चेरकर, अनंत नथुराम ठाकूर, भास्कर लक्ष्मण पाटील, हरिश्चंद्र रामा शेळके आणि हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील तसेच चाळ नाका येथील रघुनाथ पांडुरंग पिटकर या आरोपींना दिलासा मिळाला आहे. अशोक गौरु धुमाळ या आणखी एका आरोपीचे अपिल प्रलंबित असताना निधन झाले होते.रायगड सत्र न्यायालयाने या सर्वांना अपहरण, खंडणी वसुली आणि बालविवाह लावणे इत्यादी गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून दोन वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली होती. न्या. भाटकर यांनी मात्र त्यांना जास्तीत जास्त एक महिन्याच्या सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा दिली. त्यावेळी जेमतेम सव्वा पंधरा वर्षाची असलेली अंदोशी गावातील दीपा नावाची मुलगी मुंबईत मोलकरीण म्हणून काम करून पोट भरायची. गावी आली की ती गावातील मधुकर नावाच्या इसमाला भेटायची, त्याच्याशी बोलायची. गावातील गावकी चालविणाऱ्या वरील आरोपींना हे पसंत नव्हते. त्यांनी दिपा व मधुकरच्या आयांना त्यांचे लग्न लावून देण्यास सांगितले. पण दोघेही अल्पवयीन असल्याने आयांनी तसे करण्यास नकार दिला. गावकीचा दंडक मोडला म्हणून आरोपींनी या दोन्ही आयांकडून प्रत्येकी ७५० रुपये दंड सक्तीने वसूल केला. त्यांनी दीपाला तिच्या आईपासून जबरदस्तीने काढून घेऊन ९ जानेवारी ९४ रोजी तिचा विवाह आरोपींनी मधुकरशी लावून दिला.आम्ही विवाह लावला नाही, फक्त साखरपुडा केला. दंडही सक्तीने वसूल केला नाही. दीपा त्यावेळी अल्पवयीन होती याला कोणताही ठोस पुरावा नाही. मुळात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये खटला चालविण्याचा सत्र न्यायालयास अधिकारच नाही, असे अनेक मुद्दे आरोपींनी अपिलात मांडले. परंतु न्या. भाटकर यांनी ते फेटाळले व विवाह ही प्रत्येकाची खासगी व मर्जीची बाब असून त्याबाबतीत गावकी रुढी-परंपरांच्या आड कोणतीही सक्ती करू शकत नाही, असा निर्वाळा दिला.या अपिलांच्या सुनावणीत आरोपींसाठी अ‍ॅड. एस. मलिक यांनी तर सरकारसाठी अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेठ यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)