शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक खरेदीच्या एसएमएसची विक्रेत्यांना सक्ती

By admin | Updated: May 31, 2014 00:55 IST

मुद्रांक शुल्काच्या खरेदीवर राज्यात रोज कोट्यवधीचे व्यवहार होतात. मात्र खरेदी झालेल्या मुद्रांकांची नोंद शासनाला उशिरा कळविली जाते. यातून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधीचा फटका बसतो.

महत्त्वपूर्ण पाऊल : महसूल चोरी रोखण्यासाठी नवा फंडारूपेश उत्तरवार - यवतमाळ मुद्रांक शुल्काच्या खरेदीवर राज्यात रोज कोट्यवधीचे व्यवहार होतात. मात्र खरेदी झालेल्या  मुद्रांकांची नोंद शासनाला उशिरा कळविली जाते. यातून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधीचा  फटका बसतो. सोबतच  खरेदीच्या वेळी खरे कारण लपविले जाते. प्रत्यक्षात मुद्रांक दुसर्‍याच  कामासाठी वापरला जातो. त्याचा उल्लेख होत नाही. महसुलाची चोरी रोखण्यासाठी मुद्रांक शुल्क  विभागाने खरेदीचा एसएमएस सक्तीचा केला आहे. तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.काही वर्षांपूर्वी देशात मुद्रांक घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे शासनाला कोट्यवधीचा  फटका बसला होता. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने पावले उचलले  आहेत. ज्या व्यक्तीसाठी मुद्रांक घेतला त्या व्यक्तीचे नाव आणि खरेदी करणार्‍या व्यक्तीचे नाव  मुद्रांकावर सक्तीचे करण्यात आले आहे. त्याकरिता खरेदी करणार्‍याची स्वाक्षरी आवश्यक आहे.  पूर्वी मुद्रांक खरेदी करताना तो कशासाठी हवा असे तोंडी विचारले जात होते. मात्र त्याचा उल्लेख  मुद्रांकावर येत नव्हता. आता मुद्रांक खरेदी करण्याचे कारण नमूद करण्याचे आदेश आहेत.  सोबतच त्याचा संपूर्ण पत्ता, परवाना क्रमांक,  विक्रीचे ठिकाण, दिनांक, खरेदीपासून सहा महिन्यात  त्याचा वापर आदी बाबी वैध ठरविण्यात आल्या आहेत.हा मुद्रांक सहाय्यक निबंधकाकडे नेल्यानंतर अल्ट्रा व्हायोलट किरणावर तपासता येणार आहे.  सोबतच तो ज्या व्यक्तीने विकला त्या व्यक्तीला फोनकरून खातरजमा करता येणार आहे. अन्यथा  एसएमएस प्रणालीच्या सॉफ्टवेअरवर तपासणी येणार आहे. यामुळे मुद्रांक विक्री आणि  खरेदीमधील ताळमेळ तपासण्यास मदत होणार आहे. मुद्रांक बोगस तर नाही ना याची खात्री करता  येणार आहे.यासंपूर्ण प्रक्रियेने शासनाच्या महसुलात वाढ होईल. सोबतच बोगस मुद्रांक व्यवहारात आल्यास ते  कोणाकडून आले याची माहिती क्षणार्धात मिळणे शक्य होणार आहे. खरेदी झालेला मुद्रांक  खरेदीच्या तारखेपासून सहा महिन्यात वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मुद्रांकाचा  केला जाणारा कृत्रिम साठा थांबविता येणार आहे. यामुळे मुद्रांक विक्रीतून शासनाला मिळणारा  महसूल वाढण्यास मदत होणार आहे.