शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वर्षभरानंतरही ‘भोजन’ निविदा निघेना; सामाजिक न्याय विभागाच्या कासवछाप कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:18 IST

वर्ष उलटले तरी नवीन कंत्राटे बहाल करण्यात न आल्याने आधीच्या कंत्राटदारांचे चांगभले सुरुच आहे.

मुंबई : सामाजिक न्याय विभागाने पारदर्शकतेचा आव आणत अनुसूचित जातींच्या मुलांच्या वसतिगृहांतील भोजन पुरवठ्याची इ-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सप्टेंबर २०१७ मध्ये घेतला. मात्र, वर्ष उलटले तरी नवीन कंत्राटे बहाल करण्यात न आल्याने आधीच्या कंत्राटदारांचे चांगभले सुरुच आहे.सप्टेंबर २०१७ मध्ये भोजन ठेक्याबाबतची प्रक्रिया सर्वसमावेशक असेल, त्यात ४ टक्के वसतिगृहांतील भोजन पुरवठ्याचे काम अनुसूचित जातींच्या कंत्राटदारांनाच दिले जाईल, सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समितीकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यासाठी समाज कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आणि या समितीकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी प्रादेशिक उपायुक्तांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आदेश काढून प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया जानेवारी २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. आठ महिने झाले तरी नवीन भोजन ठेके देण्यात आलेले नाहीत. त्यात बेरोजगार सेवा संस्थांनी निविदा भरल्या पण ती निविदाच रद्द करण्यात आली.निविदा शुल्क म्हणून दिलेले प्रत्येकी १० हजार रुपयेही परत मिळाले नाहीत, याकडे राज्य बेरोजगार सहकारी संस्था जिल्हा फेडरेशन कृती समितीच्या पत्रकात लक्ष वेधले आहे.अधिकाऱ्यांशी संगनमतसामाजिक न्याय विभागातील काही अधिकाºयांशी संगनमत असल्यानेच नवीन निविदा प्रक्रियेची गती मुद्दाम संथ करण्यात आली असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेBJPभाजपा