शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अकरा पदोन्नतींसह ५० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष; प्राथमिक कार्यवाही सुरु झाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:01 IST

कोरोनामुळे यंदा ३० जूनपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती.

जमीर काझी -मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित प्रकरणांवर कारवाईचा बडगा व त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचवेळी पोलीस वर्तुळात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती व बदल्यांबाबत उत्सुकता लागली आहे. ११ बढत्यांसह जवळपास ५० आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त कधी मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे. पोलीस उपायुक्त ते विशेष महानिरीक्षक दर्जापर्यंतचे हे अधिकारी आहेत.कोरोनामुळे यंदा ३० जूनपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता एका पदावर किमान दोन वर्षे पूर्ण झालेल्यांमध्ये राज्य पोलीस दलातील ११ अतिरिक्त महासंचालकांच्या तर ८ विशेष महानिरीक्षक, ७ एडीसीपी-डीआयजी व ३४ उपायुक्त,-अधीक्षकांचा समावेश आहे, त्यापैकी काहींचा अपवाद वगळता सर्वांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. तर पदोन्नतीसाठी पात्र काहीजणांना त्याचठिकाणी बढती दिली जाणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.आठवड्याभरात बैठक घेऊन बदल्यांबाबत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्याबाबतची प्राथमिक कार्यवाही सुरु आहे. जुलैच्या मध्यापर्यंत आदेश जारी केले जातील, असे गृह विभागातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.गेल्यावर्षीच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या पीएवर आहे. त्याचा दबाव यंदाच्या पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्यांवर आहे.  यासाठी शक्यतो सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बढत्या व बदल्यांचे आदेश काढले जावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे सांगण्यात आले.

हे आहेत बढती मिळणारे अधिकारीआयजी प्रवीण साळुंखे, निकेत कौशिक, निखिल गुप्ता, मधुकर पांडये, ब्रिजेश सिंह, चिरंजीव प्रसाद व रवींद्र सिंगल यांना एडीजी म्हणून पदोन्नती दिली जाईल, तर सोलापूरचे आयुक्त अंकुश शिंदे यांना आयजीची बढती मिळेल. उपायुक्त राजीव जैन, इशू सिंधू व अभिषेक त्रिमुखे यांचे डीआयजी म्हणून प्रमोशन केले जाणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :PoliceपोलिसState Governmentराज्य सरकार