शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

उडाली पक्षिणी, गेली अंतराळी; चित्त बाळाजवळी ठेवूनिया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:28 IST

सोपान महाराजांचा अपघाती मृत्यू : संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज काळाआड

ठळक मुद्देह.भ.प. सोपान महाराज नामदास हे पालखी सोहळ्यासह आळंदीकडे जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झालाआळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांची समाधी होणार आळंदीतील विष्णू मंदिरापासून नामदास महाराजांची अंत्ययात्रा निघाली, यावेळी वारकरी संप्रदायातील शेकडो भाविक उपस्थित होते

पंढरपूर : नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे देती पाय! विठ्ठलाच्या प्रवेशद्वाराला नामदेव महाराजांची समाधी आहे. त्यास नामदेव पायरी असे संबोधले जाते. त्या नामदेव पायरीचे सोपान महाराज नामदास हे रोज दर्शन घेत असत. दिंडीत चालत असताना ‘जेसीबी’ने धडक दिल्याने त्यांना अपघातात देवाज्ञा झाली. संतकुळात जन्मलेल्या हा भगवत्भक्त ‘उडाली पक्षिणी, गेली अंतराळी,चित्त बाळाजवळी ठेवूनिया..’ या नामदेवांच्याच पंक्तीप्रमाणेच आपले चित्त आपणा सर्वांजवळ ठेऊन अंतराळी निघून गेला.

श्रीविठ्ठलाच्या पूर्व द्वाराला महाद्वार असे म्हटले जाते. या ठिकाणी श्री संत नामदेव पायरी आहे. नामदेव पायरीबाबत अशी आख्यायिका आहे की, एकेदिवशी भगवंत नामदेवाला म्हणाले नामदेवा तुला काय हवे असेल ते माग. त्यावर नामदेव म्हणाले, देवा मला वैकुंठ, धन व संपत्ती नको. मला फक्त भक्तांच्या चरणाची रज (पायधूळ) माझ्या मस्तकावर पडेल, अशी जागा दे. आणि नामदेव महाराजांनी देवाकडे हात जोडून महाद्वाराकडे पाहिले. ज्या ठिकाणी जमीन दुभंगली गेली त्या ठिकाणी संत महाराजांच्या घरातील १४ जणांनी समाधी घेतली आहे. तो दिवस १२३८ आषाढ वद्य त्रयोदशीचा होता.

तेव्हापासून पंढरपूरला आलेला प्रत्येक भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जाण्यापूर्वी नामदेव पायरीचे दर्शन घेत असतो. यामुळे या पायरीला अनन्य महत्त्व आहे. ह.भ.प. सोपान महाराज नामदास हे श्री संत नामदेव महाराजांच्या घराण्यातील १७ वे वंशज असून, तेही नामदेव पायरीचे रोज दर्शन घेत होते.

आळंदीत होणार समाधी- ह.भ.प. सोपान महाराज नामदास हे पालखी सोहळ्यासह आळंदीकडे जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे आळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांची समाधी होणार आहे़

संप्रदायातील शेकडोंची उपस्थिती..आळंदीतील विष्णू मंदिरापासून नामदास महाराजांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी वारकरी संप्रदायातील शेकडो भाविक उपस्थित होते. इंद्रायणी घाटावर भाविकांच्या उपस्थितीत नामदास महाराज यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.ाहे. त्यांच्या वडिलांवर पूर्वी पंढरपूर येथे चंद्रभागा वाळवंटात अंत्यसंस्कार व समाधी करण्यात आली होती.

मन विषण्ण झाले!श्री संत नामदेव महाराजांच्या वंशजांचे सतरावे वंशज ह.भ.प. सोपान महाराज नामदास यांचे अपघाती निधन झाल्याची वार्ता समजली. मन विषण्ण झाले. यातून एक गोष्ट लक्षात आली की, अनेक दिंड्या महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येतात. प्रत्येक दिंडीला त्या-त्या विभागातून संरक्षण मिळाले पाहिजे. दिंडी मार्गावर चालणाºया वाहनांना निघतानाच वेगमर्यादा कमी ठेवण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. वाहनधारकांनी तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यामुळे दिंडीमध्ये होणारे अपघात कमी होतील.- ह. भ. प. गहिनीनाथ औसेकर महाराजसहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

नामदेवांचे कार्य पुढे नेले !संत नामदेव महाराज यांचे विचार अन् कार्य पुढे घेवून जाण्याचे काम सोपान महाराज यांनी केले. पालखी सोहळ्याची परंपरा त्यांनी जोमाने पुढे नेली. त्यांच्या अपघात निधनाचे वृत्त समजताच धक्का बसला. वारकरी संप्रदायासाठी ही दुखद घटना आहे. - ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती सदस्य. 

ंमोठा आघात...ह.भ.प. सोपान महाराज नामदास यांचे पालखी सोहळ्यात अपघाती निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हि अत्यंत दु:खत घटना असून महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. संतांच्या विचाराचे समाजाला गरज आहे. या स्थितीत महाराजांचे जाणे म्हणजे अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनामुळे न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.- ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, वारकरी मंडळ, सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAccidentअपघात