शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पूरग्रस्तांना ‘निकषांबाहेर’ दिलासा; पूर्णतः नुकसान झालेल्या कच्च्या आणि पक्क्या घरांसाठी दीड लाखाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:52 IST

राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच याबाबतचा निर्णय घेतला होता आणि मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार महसूल विभागाने आदेश काढले आहेत.

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांना राज्य शासनाने बुधवारी आर्थिक मदत जाहीर केली. पूर्णपणे घर नष्ट झालेल्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये अर्थसाहाय्य दिले जाईल, त्यात कच्च्या आणि पक्क्या घरांचा समावेश असेल.

राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच याबाबतचा निर्णय घेतला होता आणि मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार महसूल विभागाने आदेश काढले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांबाहेर जाऊन मदत देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. अंशतः पडझड (किमान ५० टक्के) झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील. किमान २५ टक्के पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. किमान १५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच नष्ट झालेल्या कपड्यांसाठीही प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब ५ हजार रुपये, घरगुती भांडी/वस्तूंच्या नुकसानीसाठीही देण्यात येतील. ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. जनावरांसाठीची मदत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकडील जनावरे मृत झाली, त्यांनाही मदत दिली जाणार आहे. दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ४० हजार, ओढकाम करणारी जनावरे प्रत्येकी ३० हजार, ओढकाम करणारी लहान जनावरे प्रत्येकी २० हजार, मेंढी, बकरी, डुक्कर  प्रत्येकी ४ हजार रुपये, कुक्कुटपालन पक्षी प्रत्येकी ५० रुपये (पाच हजार रुपयांपर्यंत) अशी मदत दिली जाईल. कुक्कुटपालन शेड  नुकसानीसाठी प्रत्येकी ५  हजार रुपये, मत्स्य बोटींचे अंशतः नुकसान झालेले असल्यास प्रत्येकी १० हजार रुपये, पूर्णपणे नुकसान २५ हजार रुपये, मत्स्य जाळ्यांचे अंशतः नुकसान ५ हजार रुपये आणि पूर्णपणे नुकसान झाले तरी ५ हजार रुपयांची मदत दिली जाईल.

अंशतः पडझड (किमान ५० टक्के) झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील. 

किमान २५ टक्के पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. 

किमान १५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच नष्ट झालेल्या कपड्यांसाठीही प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पंचनाम्याच्या आधारे मदत- हस्तकला, हातमाग कारागीर बाराबलुतेदार, मूर्तिकार यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. दुकानदारांना सरसकट किमान ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत-जास्त ५० हजार  रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. - टपरीधारकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत-जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. स्थानिक रहिवाशांचे स्थानिक मतदार यादीत नाव आहे व रेशनकार्डधारक आहेत, त्यांना पंचनाम्याच्या आधारे मदत मिळेल. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेfloodपूर