शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 07:00 IST

नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे..

ठळक मुद्देमागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या 

पुणे : राज्यात काही वर्षांपुर्वीच सुरू झालेल्या शिर्डी, कोल्हापुर, नाशिक विमानतळांवरून उड्डाण होणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या विमानतळांवरून देशांतर्गत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची उड्डाणे उंचच उंच होऊ लागली आहेत. प्रामुख्याने शिर्डी व कोल्हापुर विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अनुक्रमे ७ व ४२ पटींनी वाढ झाली आहे. नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणा (एएआय) ने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात सर्वाधिक प्रवाशांची ये-जा मुंबई व पुणे विमानतळावरून होते. त्याखालोखाल नागपुर व औरंगाबाद विमानतळांचा क्रमांक लागतो. अहवालातील आकडेवारीनुसार, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे व औरंगाबाद विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येते. ही घट मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ५.८, १०.१ व ४०.९ टक्के एवढी आहे. एकीकडे या मोठ्या विमानतळांकडे प्रवाशांकडून पाठ फिरविली जात असताना इतर विमानतळांवरील प्रवाशांच्या प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे ३९ हजार ८९८ प्रवाशांनी प्रवास केला. यावर्षी याच कालावधीत तब्बल २ लाख ९३ हजार प्रवाशांनी ये-जा केली. या काळात विमानांच्या ३ हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या. कोल्हापुर विमानतळावरून विमान फेऱ्यामध्ये ११२ वरून १३२४ पर्यंत वाढ झाली आहे. तर प्रवासी संख्येचा आकडा १४३३ वरून तब्बल ६१ हजारांपर्यंत वाढला आहे. नाशिक विमानतळही यामध्ये मागे राहिलेले नाही. नाशिकमधील प्रवाशांची संख्या १२६२० वरून ४६७५६ पर्यंत वाढल्याचे दिसते. तर विमानांच्या फेऱ्या ३४६ वरून १०१४ पर्यंत वाढल्या आहेत. नागपुर, नांदेड, जळगाव विमानतळांवरून विमनांची उ्डाणे वाढू लागल्याने प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे...........शिर्डी, नाशिक व कोल्हापुरमध्ये विमानतळ सुरू होण्यापुर्वी या भागातील प्रवाशांना पुण्यात यावे लागत होते. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा ओघ मोठा असतो. पुर्वी पुण्यात विमानाने येऊन रस्त्याने शिर्डीपर्यंत जावे लागत होते. नाशिक व कोल्हापुरच्या बाबतीतही हीच स्थिती होती. पण विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलू लागले आहे. देशातील विविध शहरांना विमानसेवेद्वारे या शहरांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे थेट या शहरांमध्ये ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे. ---------------------राज्यातील विमानतळांवरील देशांतर्गत प्रवासी वाहतुक (एप्रिल ते सप्टेंबर)                           प्रवासी संख्या                       विमानांची ये-जाविमानतळ          २०१८        २०१९                     २०१८                 २०१९मुंबई        १,७७,६६,९९६    १,६७,३४,२९५          १,१९,९०६          १,१३,५२४नागपूर        १२,६५,८२६    १४,८१,१३२             १०,२८४               ११,१८९पुणे            ४४,४४,०९८    ३९,९६,५७८               २९,६२२              २६,५६४औरंगाबाद    १,७०,१२८    १,००,५१४                  १,८५०                १,०६४जुहू               ७२,६६१        ७८,०८४                  १०,१२३              १०,८७२कोल्हापुर      १,४३३        ६१,०८९                       ११२                 १,३२४जळगाव        १,४९९        २,६७४                       १९४                   १०४शिर्डी            ३९,८९८        २,९३,३०१                 ८०२                  ३,१७२नांदेड            ५३,३७०        ६७,०६९                  ८४८                  १,१०३नाशिक        १२,६२०        ४६,७५६                   ३४६             १,०१४        

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासी