शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 07:00 IST

नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे..

ठळक मुद्देमागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या 

पुणे : राज्यात काही वर्षांपुर्वीच सुरू झालेल्या शिर्डी, कोल्हापुर, नाशिक विमानतळांवरून उड्डाण होणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या विमानतळांवरून देशांतर्गत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची उड्डाणे उंचच उंच होऊ लागली आहेत. प्रामुख्याने शिर्डी व कोल्हापुर विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अनुक्रमे ७ व ४२ पटींनी वाढ झाली आहे. नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणा (एएआय) ने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात सर्वाधिक प्रवाशांची ये-जा मुंबई व पुणे विमानतळावरून होते. त्याखालोखाल नागपुर व औरंगाबाद विमानतळांचा क्रमांक लागतो. अहवालातील आकडेवारीनुसार, यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे व औरंगाबाद विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येते. ही घट मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ५.८, १०.१ व ४०.९ टक्के एवढी आहे. एकीकडे या मोठ्या विमानतळांकडे प्रवाशांकडून पाठ फिरविली जात असताना इतर विमानतळांवरील प्रवाशांच्या प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेबर या कालावधी शिर्डी विमानतळावरून विमानांच्या ८०२ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे ३९ हजार ८९८ प्रवाशांनी प्रवास केला. यावर्षी याच कालावधीत तब्बल २ लाख ९३ हजार प्रवाशांनी ये-जा केली. या काळात विमानांच्या ३ हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या. कोल्हापुर विमानतळावरून विमान फेऱ्यामध्ये ११२ वरून १३२४ पर्यंत वाढ झाली आहे. तर प्रवासी संख्येचा आकडा १४३३ वरून तब्बल ६१ हजारांपर्यंत वाढला आहे. नाशिक विमानतळही यामध्ये मागे राहिलेले नाही. नाशिकमधील प्रवाशांची संख्या १२६२० वरून ४६७५६ पर्यंत वाढल्याचे दिसते. तर विमानांच्या फेऱ्या ३४६ वरून १०१४ पर्यंत वाढल्या आहेत. नागपुर, नांदेड, जळगाव विमानतळांवरून विमनांची उ्डाणे वाढू लागल्याने प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे...........शिर्डी, नाशिक व कोल्हापुरमध्ये विमानतळ सुरू होण्यापुर्वी या भागातील प्रवाशांना पुण्यात यावे लागत होते. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा ओघ मोठा असतो. पुर्वी पुण्यात विमानाने येऊन रस्त्याने शिर्डीपर्यंत जावे लागत होते. नाशिक व कोल्हापुरच्या बाबतीतही हीच स्थिती होती. पण विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलू लागले आहे. देशातील विविध शहरांना विमानसेवेद्वारे या शहरांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे थेट या शहरांमध्ये ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे. ---------------------राज्यातील विमानतळांवरील देशांतर्गत प्रवासी वाहतुक (एप्रिल ते सप्टेंबर)                           प्रवासी संख्या                       विमानांची ये-जाविमानतळ          २०१८        २०१९                     २०१८                 २०१९मुंबई        १,७७,६६,९९६    १,६७,३४,२९५          १,१९,९०६          १,१३,५२४नागपूर        १२,६५,८२६    १४,८१,१३२             १०,२८४               ११,१८९पुणे            ४४,४४,०९८    ३९,९६,५७८               २९,६२२              २६,५६४औरंगाबाद    १,७०,१२८    १,००,५१४                  १,८५०                १,०६४जुहू               ७२,६६१        ७८,०८४                  १०,१२३              १०,८७२कोल्हापुर      १,४३३        ६१,०८९                       ११२                 १,३२४जळगाव        १,४९९        २,६७४                       १९४                   १०४शिर्डी            ३९,८९८        २,९३,३०१                 ८०२                  ३,१७२नांदेड            ५३,३७०        ६७,०६९                  ८४८                  १,१०३नाशिक        १२,६२०        ४६,७५६                   ३४६             १,०१४        

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासी