शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्माघाताचे पाच बळी; ३०० रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 02:41 IST

प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते.

मुंबई : सध्या सूर्य आग ओकत असल्यामुळे राज्यात मार्च महिन्यापासून आतापर्यंत पाच जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यातील औरंगाबादच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे, तर उर्वरित चार जणांचा मृत्यूही उष्माघातानेच झाल्याचा संशय असून, त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते. त्यामुळे घाम येत नाही आणि शरीराचे तापमान वाढत जाऊन ती व्यक्ती बेशुद्ध होते. त्यानंतर कोमामध्ये जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. घडणाऱ्या या प्रकाराला साधारणत: ‘उष्माघात’ असे म्हणतात. विशेषकरून विदर्भ-मराठवाडा येथे याचा जास्त प्रादुर्भाव आहे, अशी माहिती उष्माघात नियंत्रण कक्षाचे डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले रुग्ण, लहान बालके यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. उष्माघाताचे गांभीर्य लक्षात घेता यासंदर्भातील प्राथमिक लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉ. भोई यांनी केले आहे.

राज्यात गेल्या अडीच महिन्यांत उष्माघाताच्या ३०० रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात नागपूरमध्ये सर्वाधिक १६० उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी काही जणांवर उपचार सुरू आहेत, तर काही उपचाराअंती बरे झालेले आहेत. यामध्ये लातूर १६, अकोला ३६, अमरावती ११, बुलडाणा २, नागपूर जिल्हा २९, नागपूर शहर ५८ असे एकूण १६० रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी नागपूर शहर आणि जिल्हा मिळून ८७ रुग्ण हे नागपूरमधील आहेत.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात