शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

राज्यात उष्माघाताचे पाच बळी; ३०० रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 02:41 IST

प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते.

मुंबई : सध्या सूर्य आग ओकत असल्यामुळे राज्यात मार्च महिन्यापासून आतापर्यंत पाच जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यातील औरंगाबादच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे, तर उर्वरित चार जणांचा मृत्यूही उष्माघातानेच झाल्याचा संशय असून, त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते. त्यामुळे घाम येत नाही आणि शरीराचे तापमान वाढत जाऊन ती व्यक्ती बेशुद्ध होते. त्यानंतर कोमामध्ये जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. घडणाऱ्या या प्रकाराला साधारणत: ‘उष्माघात’ असे म्हणतात. विशेषकरून विदर्भ-मराठवाडा येथे याचा जास्त प्रादुर्भाव आहे, अशी माहिती उष्माघात नियंत्रण कक्षाचे डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले रुग्ण, लहान बालके यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. उष्माघाताचे गांभीर्य लक्षात घेता यासंदर्भातील प्राथमिक लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉ. भोई यांनी केले आहे.

राज्यात गेल्या अडीच महिन्यांत उष्माघाताच्या ३०० रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात नागपूरमध्ये सर्वाधिक १६० उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी काही जणांवर उपचार सुरू आहेत, तर काही उपचाराअंती बरे झालेले आहेत. यामध्ये लातूर १६, अकोला ३६, अमरावती ११, बुलडाणा २, नागपूर जिल्हा २९, नागपूर शहर ५८ असे एकूण १६० रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी नागपूर शहर आणि जिल्हा मिळून ८७ रुग्ण हे नागपूरमधील आहेत.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात