शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

विहिरीत गुदमरून पाच मजुरांचा मृत्यू

By admin | Updated: April 1, 2015 02:09 IST

सार्वजनिक नळ योजनेच्या विहिरीतील गाळ काढताना गुदमरून पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथे मंगळवारी सकाळी ११

यवतमाळ : सार्वजनिक नळ योजनेच्या विहिरीतील गाळ काढताना गुदमरून पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. गाळ उपसण्यासाठी विहिरीत सोडलेल्या इंजीनचा धूरच या पाच जणांसाठी काळ ठरला. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले.मृतांमध्ये विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), भूपेश कवडू कुडमते (३०), आशिष तुकाराम मडावी (३५), शंकर रमेश जोगी (३२), गणेश राजू नंदूरकर (२५) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून कारेगाव या गावाची पाणीपातळी खालावली आहे़ परिणामी गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या़ या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने विहिरीतील गाळ उपसण्याचा निर्णय घेतला. यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजेपासूनच कामाला सुरुवात झाली. केवळ एकच व्यक्ती आत उतरू शकेल, एवढी जागा विहिरीवर आहे. उर्वरित पूर्ण भागावर स्लॅब आहे. छोट्या जागेतून विहिरीतील पाणी उपसण्यासाठी डिझेल इंजीन सोडण्यात आले. यानंतर अन्य सहा मजूर विहिरीत उतरले. इंजीन सुरू करताच धूर झाला. धूर बाहेर पडण्यासाठी मोठी जागा नसल्याने विहिरीतच कोंडला गेला. याचे प्रमाण वाढताच मजुरांचा श्वास गुदमरला. त्यातच पाच जणांचा मृत्यू झाला. रामू देवराव बावने आणि प्रफुल्ल वामन हिवरकर या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले. (प्रतिनिधी)