शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हनुमान टाकळीतील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा; रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 08:04 IST

लाल दगडातील कोरीव शिल्पाचे राज्यातील एकमेव मंदिर

चंद्रकांत गायकवाडतिसगाव (जि. अहमदनगर) :  

स्पर्धेच्या युगातही धार्मिक सण, उत्सव सामूहिकपणे साजरे करण्याची परंपरा पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी गावाने मनस्वी जपली आहे. येथील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा आहे. लाल दगडातील कोरीव शिल्पाचे राज्यातील हे एकमेव मंदिर आहे. 

चक्रवर्ती राजा हर्षवर्धनाने टाकळी नामक वनस्पतींचे जंगल असलेल्या या भूमीत मोठा महायज्ञ केल्याची आख्यायिका आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांनी सन १५७५ च्या सुमारास गोमयीन हनुमान मूर्तीची स्वहस्ते प्रतिष्ठापना केली आहे. नाशिकजवळील टाकळी गावासारखीच समर्थांनी स्थापित केलेली गोमयाची हनुमान मूर्ती (गायीच्या शेणापासून निर्मिती असलेली) व हनुमानाच्या नावाने परिचयास आलेले श्री क्षेत्र हनुमान टाकळी हे गाव राज्यातील एकमेव आहे. नाथ संप्रदायाचे अध्वर्यू संत मोरेश्वर, प. पू. माधवस्वामी या गुरुशिष्यांमुळे १९६९ च्या कालखंडानंतर या देवभूमीचे पौराणिक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

मायंबापासून उगम पावणारी पवनागिरी, तर वृद्धेश्वरहून प्रवाही होणारी वृद्धा या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे स्थान वसले आहे. पौराणिक काळाच्या मागोव्यानुसार येथील हनुमान जयंती उत्सवाला ५०० वर्षांची परंपरा असल्याचे दिसून येते.

विदेशात महती- समर्थ हनुमान देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष माधवस्वामी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर येथील मंदिर जीर्णोद्धार आरंभ केला. भरतपूर बयाणा येथील बन्सीपहाड नामक लाल दगडातील कोरीव शिल्पाचे हे काम प. पू. रमेशआप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आता कळसाकडे सुरू आहे. - अमेरिकेतील समर्थ भक्त शंकर पंडित यांनी रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ इंग्रजीमध्ये भाषांतरित केला. त्या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर टाकळीच्या गोमयीन हनुमान मूर्तीचे छायाचित्र वापरले आहे. त्यामुळे या स्थानाची महती देश-विदेशात गेली आहे.

 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती