शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हनुमान टाकळीतील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा; रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 08:04 IST

लाल दगडातील कोरीव शिल्पाचे राज्यातील एकमेव मंदिर

चंद्रकांत गायकवाडतिसगाव (जि. अहमदनगर) :  

स्पर्धेच्या युगातही धार्मिक सण, उत्सव सामूहिकपणे साजरे करण्याची परंपरा पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी गावाने मनस्वी जपली आहे. येथील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा आहे. लाल दगडातील कोरीव शिल्पाचे राज्यातील हे एकमेव मंदिर आहे. 

चक्रवर्ती राजा हर्षवर्धनाने टाकळी नामक वनस्पतींचे जंगल असलेल्या या भूमीत मोठा महायज्ञ केल्याची आख्यायिका आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांनी सन १५७५ च्या सुमारास गोमयीन हनुमान मूर्तीची स्वहस्ते प्रतिष्ठापना केली आहे. नाशिकजवळील टाकळी गावासारखीच समर्थांनी स्थापित केलेली गोमयाची हनुमान मूर्ती (गायीच्या शेणापासून निर्मिती असलेली) व हनुमानाच्या नावाने परिचयास आलेले श्री क्षेत्र हनुमान टाकळी हे गाव राज्यातील एकमेव आहे. नाथ संप्रदायाचे अध्वर्यू संत मोरेश्वर, प. पू. माधवस्वामी या गुरुशिष्यांमुळे १९६९ च्या कालखंडानंतर या देवभूमीचे पौराणिक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

मायंबापासून उगम पावणारी पवनागिरी, तर वृद्धेश्वरहून प्रवाही होणारी वृद्धा या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे स्थान वसले आहे. पौराणिक काळाच्या मागोव्यानुसार येथील हनुमान जयंती उत्सवाला ५०० वर्षांची परंपरा असल्याचे दिसून येते.

विदेशात महती- समर्थ हनुमान देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष माधवस्वामी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर येथील मंदिर जीर्णोद्धार आरंभ केला. भरतपूर बयाणा येथील बन्सीपहाड नामक लाल दगडातील कोरीव शिल्पाचे हे काम प. पू. रमेशआप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आता कळसाकडे सुरू आहे. - अमेरिकेतील समर्थ भक्त शंकर पंडित यांनी रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ इंग्रजीमध्ये भाषांतरित केला. त्या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर टाकळीच्या गोमयीन हनुमान मूर्तीचे छायाचित्र वापरले आहे. त्यामुळे या स्थानाची महती देश-विदेशात गेली आहे.

 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती