शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वरळी नाक्यावर पाच तास तणाव, कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 05:05 IST

- महाराष्ट्र बंदचा फटका वरळी नाका आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बसला. वरळी नाक्यावर जमलेल्या आंदोलकांनी येथील व्हीव्हीआयपी मार्ग सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोखून धरला होता.

मुंबई - महाराष्ट्र बंदचा फटका वरळी नाका आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बसला. वरळी नाक्यावर जमलेल्या आंदोलकांनी येथील व्हीव्हीआयपी मार्ग सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोखून धरला होता. पोलिसांनी येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असले, तरी इतर भागांच्या तुलनेत येथे अधिक तणावाचे वातावरण होते़उपनगरातील बंदचे पडसाद दादरहून वरळी नाक्यापर्यंत काही वेळातच उमटले़ वरळी नाका व आजूबाजूच्या परिसरात आंदोलकांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. करी रोड आणि लोअर परेल स्थानकावरुन याठिकाणी येणाºया शेअर टॅक्सी बंद असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागली.महाराष्ट्र बंदचे सर्वात तीव्र पडसाद चेंबूरमध्ये उमटले. मंगळवारपासूनच चेंबूरमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यात सकाळी नऊच्या दरम्यान चेंबूर पूर्वेकडील पी. एल. लोखंडे मार्गावर सोफा जाळण्यात आला. ११ वाजता येथील स्कूलबस झालेल्या दगडफेकीनंतर ठिकठिकाणी हिंसक आंदोलन पेटले.३२ विमान उड्डाणे रद्दमहाराष्ट्र बंदचा फटका विमान प्रवाशांनादेखील बसला. बंदमुळे १६ विमानांचे आगमन आणि १६ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळ प्राधिकरणाने दिली. तसेच बुधवारी विमानतळावरूनघरी जाणाºया प्रवाशांनादेखील मानसिक त्रास सहन करावा लागला. विमानतळाहून घरी जाण्यासाठी टॅक्सी, वातानुकूलित टॅक्सी किंवा अ‍ॅप बेस टॅक्सी उपलब्ध नव्हत्या. रिक्षांचीही वानवा होती. प्राधिकरणाने टर्मिनस १ व २वरून प्रवाशांना जवळच्या स्थानकावर पोहोचवण्यासाठी बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र रस्त्यावरील एकंदर परिस्थिती पाहता अनेक प्रवाशांनी विमानतळ परिसरातच सुरक्षितपणे राहणे पसंत केले.कोणाचीही गय केली जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोरेगाव भीमा येथे जी काही घटना घडली आहे, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले.कोरेगाव भीमा येथील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी सायंकाळी माध्यमांशी बोलत होते. भीमा कोरेगावजवळ सणसवाडीतील घटनेवर सरकारची भूमिका नव्याने स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरेगाव भीमा येथील घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही जात आहोत. याप्रकरणी चौकशीसाठी विद्यमान न्यायमूर्तींची नियुक्ती व्हावी अशी आम्ही विनंती करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.८५ तास ‘ते’ उभेच...थर्टीफर्स्टच्या पहाटे ४ वाजल्यापासून सुरु झालेला बंदोबस्त, १ जानेवारी भीमा कोरेगाव घटना आणि त्याच्या निषेधार्थ आंदोलने आंणि बंदच्या काळात तैनात असलेले पोलीस ८५ तासांहून अधिक वेळ उभाच असल्याची परिस्थितीही तितकीच खरी. लांब राहणाºया पोलिसांनी बंदोबस्तामुळे पोलीस ठाण्यातच राहिले. कुठलीही तक्रार न करता पोलिसाने ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. हे तितकेच कौतुकास्पद आहे.आज गुजरात बंद?मुंबई : कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्टÑ बंद आंदोलन करण्यात आले. त्याच प्रकारे ४ जानेवारी रोजी या घटनेच्या निषेधार्थ गुजरात बंद ठेवण्यात येणार असल्याचे गुजरात मधील अनेक संघटनांनी जाहिर केले आहे. या संघटनांमध्ये गुजरात मधील दलित संघटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. समता सैनिक दल, गुजरात दलित संघटन, दलित अधिकार आंदोलन, बहुजन वोलन्टरी फोर्स, दलित युवा विकास संगठन, सौराष्ट्र दलित संगठन अशा ३० हून अधिक संघटनांनी गुजरात बंदची हाक दिली आहे.एकबोटे, भिडेंविरोधात आणखी एक तक्रारच्पुणे : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात बुधवारी येरवडा पोलिस ठाण्यात आणक़जखी एक तक्रार अर्ज आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी ही तक्रार दिली असून ती शिक्रापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिली. याअगोदर दोघांवर मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरेगाव भीमा येथे जो काही घटनाक्रम घडला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे नमूद करताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सर्वांनी शांतता राखावी. दोन समाज समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. माध्यमांनीही पहिल्या दिवसापासून जो संयम दाखवला तो यापुढेही दाखवावा व शांतता राखण्यास हातभार लावावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.राज्यभरातील बंद व कोरेगाव भीमामधील घटनेच्या दरम्यान पोलिसांनी संयमाने स्थिती हाताळली. कुठेही लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही. हा संवेदनशील विषय असल्याने तो संयमाने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व घटनेचा योग्य पद्धतीने तपास केला जाईल, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.विद्यापीठाला दुपारनंतर जागमुंबईसह राज्यात बंदचे पडसाद सकाळपासूनच उमटायला सुरुवात झाली होती, पण तरीही विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलणार नसल्याचे जाहीर केले, त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण होता. परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकल्यास काय करायचे? याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. विद्यापीठाने सकाळच्या सत्रातील ४ परीक्षा घेतल्याच, पण दुपारनंतर राज्यासह मुंबईवरचा ताण वाढताना पाहून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला. दुपारी २ वाजता परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येतील, असे विद्यापीठाने जाहीर केले. कलिना बॉम्बे कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालात काही आंदोलक घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. महाविद्यालय बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पण, महाविद्यालय बंद न करण्याचा निर्णय विद्यालय प्रशासनाने घेतला. विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना महाविद्यालयातच काही वेळ थांबवून ठेवण्यात आले होते.रुग्णालयातील गर्दी ओसरलीशहर-उपनगरांतील जे. जे. रुग्णालय, केईएम, नायर, सायन रुग्णालयांत मुंबईबाहेरून उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्ण येत असतात. मात्र, बुधवारी ‘महाराष्टÑ बंद’च्या पार्श्वभूमीवर ‘रेल रोको’ झाला. त्याचप्रमाणे, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गही वाहतुकीस बंद झाल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे एरव्ही दररोज जवळपास ८ हजार रुग्ण केईएम रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. मात्र, बंदचा फटका बसल्याने केवळ ३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद