पाच दिवसांचा आठवडा

By Admin | Updated: September 29, 2015 03:21 IST2015-09-29T03:21:02+5:302015-09-29T03:21:02+5:30

राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही आठवड्यातील कामकाज ६ऐवजी

Five days a week | पाच दिवसांचा आठवडा

पाच दिवसांचा आठवडा

यदु जोशी,मुंबई
राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही आठवड्यातील कामकाज ६ऐवजी ५ दिवस करण्यास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हिरवा झेंडा दाखविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर येण्याची शक्यता आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी-अधिकारी संघटनांनी ३१ आॅगस्ट
रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवृत्तीचे वय ६० वर्षे आणि ५ दिवसांचा आठवडा करा, अशा दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्यानुसार या मागण्यांवर अभ्यास करून प्रस्ताव देण्यास मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव क्षत्रिय यांना सांगितले होते.
सूत्रांनी सांगितले की, पाच दिवसांचा आठवडा करताना कामकाजाची वेळ वाढवून द्यावी, असा प्रस्ताव क्षत्रिय यांनी तयार केला आहे. तो लवकरच मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी जाईल आणि नंतर तो मंत्रिमंडळासमोर येईल. सध्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते ५.३० किंवा काही जिल्ह्णांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ अशी आहे. म्हणजे ७ तास ४५ मिनिटे कामकाज चालते.
याऐवजी, आठवड्यातून पाच दिवस रोज ४५ मिनिटे जादा काम करण्याची तयारी संघटनांनी आधीच दर्शविली आहे. पाच दिवसांचा आठवडा करताना कामकाजाची वेळ वाढविली जाईल, हे स्पष्ट आहे. या संबंधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली मुख्य सचिव कार्यालयात सुरू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या दुसऱ्या आणि चवथ्या शनिवारी सुटी असते. मात्र, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दर शनिवारी सुटी असते. आठवड्यात दोन दिवस सुटी असेल तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन ते अधिक चांगले काम करू शकतात, असा तर्क पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी दिला जातो. शिवाय, पाच दिवसांचा आठवडा केल्याने सरकारची एक दिवसाची वीज आणि इतर खर्च वाचतो, असाही दावा केला जातो.
पाच दिवसाच्या आठवड्यावर मंत्रिमंडळाची मोहर उमटताच शासकीय कर्मचाऱ्यांचा ‘विक एन्ड’ जोरात साजरा होणार.
---------
राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८वरून ६० वर्षे करण्याची संघटनांची मागणी होती; मात्र ती अमान्य करण्यात आली असून, केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० असून, ते कायम राहील, असेही सूत्रांनी सांगितले.
--------
पहिल्या टप्प्यात मुंबई!
मुंबईतील कर्मचारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी ३-४ तासांचा प्रवास करतो. त्यामुळे पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी सुरुवातीला मुंबईत करावी असाही एक प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, मंत्रालयासह राज्य सरकारची अनेक मुख्यालये येथे असल्याने अन्यत्र शनिवारी कार्यालये सुरू व मुख्यालय बंद, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
-----------
कर्मचारी संघटनांनी सरकारला दिलेला प्रस्ताव
कर्मचाऱ्यांची महिन्यातील वर्षातील ३० मिनिटांचा भोजनमहिन्यातील वर्षात
कार्यालयीन वेळसरासरी दिवस सरासरी दिवसकालावधी वगळून कामाचे तास तास
सध्या२४ (२ शनिवार व २८८ ७ तास १५ मिनिटे १७४२०७७
९.४५ ते ५.३०४ रविवार वगळून)(२४ * १२)(४३५ मिनिटे)तासतास
५ दिवसांचा आठवडा २२ (४ शनि. व २६४८ तास१७६ २११२
९.४५ ते ६.१५४ रवि. वगळून) (२२*१२)(४८० मिनिटे)तासतास

Web Title: Five days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.