मत्स्यबीजोत्पादन घटले!
By Admin | Updated: August 20, 2014 21:54 IST2014-08-20T21:54:34+5:302014-08-20T21:54:34+5:30
कृषी विद्यापीठाला फटका : पावसाने पाठ फिरविल्याचा परिणाम

मत्स्यबीजोत्पादन घटले!
अकोला : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मत्स्य बीजोत्पादन घटले आहे. गतवर्षी वीस हजार मत्स्य बीजांची विक्री करणार्या या विद्यापिठाकडे यंदा मत्स्यबीज उपलब्धच नसल्याने मत्स्य शेती करणार्या शेतकर्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
कृषी विद्यापिठात स्वतंत्र मत्स्य विभाग असून, या विभागाच्या क्षेत्रावर आठ ते दहा तळी व हॅचरी बांधण्यात आली आहेत. या तळ्य़ात रोहू, कथला व मृगळ या जातींची मासे व मत्स्यबीज तयार केले जाते. मत्स्य शेती करणार्या शेतकर्यांना दरवर्षी येथून वीस ते पंचविस हजार मत्स्य बिजांची विक्री केली जाते. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने तळे कोरडे पडले आहेत. वास्तविक मत्स्य व्यवसाय करण्यासाठी विदर्भाला जवळपास २५ ते ३0 कोटी मत्स्यबीजांची गरज आहे. त्यामुळे शेतकर्यांना यंदा कोलकाता येथून मत्स्यबीज आणावे लागणार असल्याने, तो खर्चही वाढणार आहे. जुलैमध्ये मत्स्य बीजनिर्मिती करू न तळ्य़ात सोडली जातात. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या बिजांची शेतकर्यांना विक्री केली जाते. यामध्ये बोटुकली, अर्धबोटुकली आकारांचे मत्स्यबीज असतात. विद्यापीठात मत्स्यसंवर्धन, संगोपनासह संशोधनाचेही काम केले जात असून, अनेक शोभिंवत रंगीत माशांची पैदास करण्यात आली आहे. या माशांना अधिक मागणी आहे; परंतु गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या मत्स्य विभागाची ही कामंदेखील थंडावली आहेत.