शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

नव्या सरकारमधील पहिले वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नावे; ठाकूर टीकेच्या केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:31 IST

भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झाले आहे.

मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करण्यात भाजपच नव्हे तर पुन्हा एकदा सत्तेत परतलेल्या काँग्रेसचे नेते देखील निष्णांत आहेत. 2014 पूर्वी सत्तेत असताना अनेक काँग्रेस नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्य करण्यात आली होती. आता सत्तेत आलेल्या काँग्रेसकडून खातेवाटप निश्चित होताच वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

राजकारणात रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले. 

ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. कारंजा येथे शनिवारी त्यांनी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे प्रचारसभेत सांगितले. ठाकूर यांनी महाविकास आघाडीकडून वादग्रस्त वक्तव्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढचा नंबर कोण लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झाले आहे.