शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

नव्या सरकारमधील पहिले वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नावे; ठाकूर टीकेच्या केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:31 IST

भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झाले आहे.

मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करण्यात भाजपच नव्हे तर पुन्हा एकदा सत्तेत परतलेल्या काँग्रेसचे नेते देखील निष्णांत आहेत. 2014 पूर्वी सत्तेत असताना अनेक काँग्रेस नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्य करण्यात आली होती. आता सत्तेत आलेल्या काँग्रेसकडून खातेवाटप निश्चित होताच वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

राजकारणात रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले. 

ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. कारंजा येथे शनिवारी त्यांनी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे प्रचारसभेत सांगितले. ठाकूर यांनी महाविकास आघाडीकडून वादग्रस्त वक्तव्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढचा नंबर कोण लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झाले आहे.