शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

नव्या सरकारमधील पहिले वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नावे; ठाकूर टीकेच्या केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:31 IST

भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झाले आहे.

मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करण्यात भाजपच नव्हे तर पुन्हा एकदा सत्तेत परतलेल्या काँग्रेसचे नेते देखील निष्णांत आहेत. 2014 पूर्वी सत्तेत असताना अनेक काँग्रेस नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्य करण्यात आली होती. आता सत्तेत आलेल्या काँग्रेसकडून खातेवाटप निश्चित होताच वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

राजकारणात रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले. 

ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. कारंजा येथे शनिवारी त्यांनी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे प्रचारसभेत सांगितले. ठाकूर यांनी महाविकास आघाडीकडून वादग्रस्त वक्तव्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढचा नंबर कोण लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झाले आहे.