आधी नेता निवडा, मग निवडणूक लढा!

By Admin | Updated: June 1, 2014 01:33 IST2014-06-01T01:33:39+5:302014-06-01T01:33:39+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथम नेता निवडावा व त्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

First choose the leader, then fight the elections! | आधी नेता निवडा, मग निवडणूक लढा!

आधी नेता निवडा, मग निवडणूक लढा!

>सडेतोड मुलाखत : मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत फरक पडलेला नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
 
अतुल कुलकर्णी - मुंबई
 
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथम नेता निवडावा व त्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. मोदींना मिळालेल्या यशाचे गमक त्यांच्याकडे पक्षाने आधी नेतृत्व देण्यामध्ये आहे. तामिळनाडूत जयललिता, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ओडिशात नवीन पटनायक यांनीदेखील असेच यश मिळवलेले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
काँग्रेससोबत निवडणूक एकत्र लढवायची असेल तर मोठय़ा साहेबांनी महत्त्वाचे नेते, मंत्री, कार्यकर्ते यांना एकेकटय़ाला बोलवून 
त्यांचे मत जाणून घ्यावे आणि पुढे जावे, असे माङो मत आहे. असे सांगतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीत दारुण पराभवानंतरही काहीच फरक पडलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. गेल्या काही वर्षात आघाडी सरकारमधील सत्ताधा:यांचीच भांडणो पाहून जनता वैतागली होती. त्याचा जबरदस्त फटका आम्हाला बसला, हेदेखील सांगायला ते विसरले नाहीत. त्यांच्याशी झालेली ही बातचीत-
राष्ट्रवादीचे मंत्री भ्रष्टाचारी आहेत, या प्रतिमेचा फटका बसला, असे वाटत नाही?
- हे चित्र कोणी निर्माण केले, का केले, त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. आम्ही राजकारणात 25 वर्षापासून आहोत. अनेक पदं आम्ही भूषवली. पण साप साप म्हणून भुई धोपटायची आणि त्यातून प्रतिमा मलिन करायची असले प्रकार झाले. जे लोक मीडिया, आणि पेपर वाचून मतं बनवतात ती खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो.
श्वेतपत्रिका असो किंवा ऊर्जा, बांधकाम खात्याचा विषय असो सरकारनेच तुमच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाचा किती फटका तुम्हाला बसला?
- आघाडी सरकार चालवत असताना काही मर्यादा दोघांनीही पाळल्या पाहिजेत. विलासराव देशमुख यांना अनुभव होता, राजकीय कौशल्य पणाला लावून त्यांनी आठ वर्षे व्यवस्थित सरकार चालवले. सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक चव्हाण यांच्या बाबतीत ही तीच गोष्ट अनुभवायला आली. पण नंतर दुर्दैवाने दोन्ही काँग्रेस एकमेकांना शत्रू मानू लागलो.
सध्या सरकारमध्ये असणा:या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे केले..
- हो. आमचे राजकीय शत्रू कोण होते? भाजपा, शिवसेना आणि मनसे. परंतु स्थानिक कार्यकत्र्याना, नेत्यांना हेच पक्ष जवळचे वाटू लागले, आणि काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांना शत्रू नंबर एक मानू लागली. याचाही फटका आम्हाला बसला. 
राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी खणलेल्या खड्डय़ात दोघेही पडले असे तर आपल्याला म्हणायचे नाही..
आघाडी सरकार चालवताना काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. त्यात आमच्या दोघांच्याही चुका आहेत. दोन्ही काँग्रेसचे मंत्री इतर वेळी सतत भांडत बसतात आणि निवडणुका आल्या की गळ्यात गळे घालून फिरतात हे न कळण्याएवढे लोक दुधखुळे नाहीत. ते प्रतिक्रिया देत नाहीत. शांतपणो पाहतात आणि बटन दाबून धडा शिकवतात. 
काँग्रेसचे लक्ष्य राष्ट्रवादी असतानाही तुमच्या चार जागा आल्या आणि त्यांच्या दोनच आल्या..
- अशोकरावांची जागा त्यांच्या स्वत:च्या ताकदीवर आली. आता चार काय आणि दोन काय.. शेवटी अपयशच आहे ते.. उगीच वासरात लंगडी गाय शहाणी म्हणण्यात काय अर्थ आहे. पक्षाला दोघांच्या चुकांची किंमत भोगावी लागली आहे. 
भाजपा शिवसेना सत्ताधा:यांसाठी सहयोगी पक्षासारखी आहे असे म्हटले जात होते, दुसरीकडे आघाडी सरकार पंधरा वर्षापासून सत्तेत आहे तरीही असा दारुण पराभव का झाला?
- मोदींना जाणीवपूर्वक पुढे आणले गेले. काहींचा त्यांना विरोध होता पण तोही त्यांनी शांत केला. आम्ही (दोन्ही पक्ष) मात्र लोकांना आमचे म्हणणो पटवून देण्यात कमी पडलो. लोक आमच्या सभांना आले पण बटन मात्र दुस:याचेच दाबून गेले.
राज्यात अनेक निर्णय कागदावरच आहेत. लोकमतने त्याची यादीच छापली. सरकार निर्णय घेते पण अंमलबजावणीच होत नाही त्याचे काय?
- आपल्याकडे कायदे, नियम असे आहेत की राज्याचा मुख्यमंत्री त्यात सर्वस्वी अंतिम असतो. त्यामुळे त्यांनी पण या गोष्टी लक्षात घेऊन धाडसाने पावलं उचलली पाहिजेत. आम्ही विनंती करण्याचे काम करतो परंतु कोणाचे किती ऐकायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.. यापेक्षा जास्त स्पष्ट मी काय बोलणार?
जलसिंचनाची श्वेतपत्रिका काढली. त्यातून फायदा होण्याच्या ऐवजी राज्य आणखी दोन पाच वर्षे मागे गेले आहे. गेल्या दोन वर्षात एकाही प्रकल्पाला मंजुरीच मिळालेली नाही..
- यासाठी नेमलेल्या चितळे समितीचा अहवाल आला. एसआयटीने दिलेला अहवाल व त्यावरचा एटीआर (अॅक्शन टेकन रिपोर्ट) लवकरात लवकर जनतेसमोर, विधिमंडळासमोर यायला हवा. कोणाच्या चुका झाल्या, कोण दोषी आहे, काय करायचे आहे हे जनतेसमोर आले पाहिजे..
पण हे जनतेसमोर तुम्हीच तर आणायचे आहे ना..
- आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. लवकरात लवकर त्यांनी एटीआर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विधिमंडळात आणावा, अशी आमचीच मागणी आहे.
शरद पवार यांनी तरुणांना संधी दिली पाहिजे, असे सांगितले आहे. आपण जितेंद्र आव्हाड यांना मंत्री केले. आणखी काही बदल होतील?
- पक्षाचे जे कोणी पार्लमेंटरी बोर्डात बसतील, त्यांनी मोठय़ा साहेबांचे हे म्हणणो कृतीत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक निवडणुकीत नवे जुने चेहरे आणले पाहिजेत. नव्यांच्या मनात काही वेगळ्या कल्पना असतात. तसेच पक्षात आणखी बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
मग तुमच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवावी असे वाटते का?
- नाही.. नाही.. सर्वसहमतीने ज्याचे नाव ठरेल त्याच्या नेतृत्वाखाली! भाजपाने अनेक दिग्गजांना बाजूला सारून मोदींचे नाव आणलेच ना..
हेच तुमच्याही पक्षात घडेल.?
नेता कोण हे आधी ठरवायचे तर हे करावेच लागेल. लोकांमध्ये आता तो कन्सेप्ट रुजला आहे. शेवटी कणखर आणि धाडसी निर्णय घेणारे लोकच जनतेला आवडतात..
अजूनही काँग्रेससोबत लढावे असे आपले मत कायम आहे.?
- पवार साहेबांनी एकत्र लढायचे असे सांगितले. परंतु उद्या एकेकटय़ाला बोलावून आणि एकत्र बसून सगळ्यांचे वेगवेगळे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्ते, नेत्यांना काय हवे आहे ते कळेल. नेतृत्व करणा:यांनी चर्चा करुन निर्णय घेतले पाहिजेत.
आपण 16 ते 18 तास राज्यासाठी वेळ देणार असे शरद पवार म्हणाले. याचा दुसरा अर्थ राज्यात काम करण्यांना यश आले नाही, असा होत नाही का?
- तसा अर्थ निघू शकतो ना.. केंद्रात युपीएचे सरकार आता नाही. ते असताना जेवढी जबाबदारी होती तेवढी विरोधी पक्षात असताना नसते. तुमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असेल तर दिल्लीत दिवस ठरवून गेलात तरी चालते. पण शेवटी स्वत:चे घर मजबूत असेल तर बाकी सगळे.. महाराष्ट्र हे राष्ट्रवादीचे घर आहे. ते थोडेसे खिळखिळे झाले आहे. कार्यकत्र्यानी नाऊमेद होऊ नये, म्हणून त्यांना थोडे टॉनिक देण्याची गरज असते. अनेक चढउतार पाहिलेले पवार साहेब या वयातही पुन्हा संघटनेला ताकद देण्यासाठी वेळ देण्याची भाषा करतात त्यावेळी आम्ही 15 वर्षे मंत्रीपदं भोगणा:यांनी त्याचा विचार करायला हवा. 
पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. आता बोलून काय उपयोग अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी देखील दिली व आपल्यावरही नाराजी व्यक्त केली होती..
- ते अनुभवी आहेत. त्यांच्या मतात तथ्य असेल तर तपासून दुरुस्ती केली पाहिजे. काहींच्याकडून नेहमीच आपण निवडून येतो म्हणून मस्तवालपणा दाखवला जातो, तर सतत सत्ता मिळत गेली की चुकीचे वर्तनही होते. त्याचा फटका बसतोच..
प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या व्यासपीठावरुन काँग्रेस आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली. आता बोलून काय उपयोग असे नाही वाटत तुम्हाला..
- वरिष्ठांचे काही आवडले नाही तर मी त्याची जाहीर वाच्यता करणार नाही. 
याचा अर्थ तुम्हाला ते पटलेले दिसत नाही.़
- नाही. असे म्हणता येणार नाही. पक्षाने चार भिंतीच्या आत बसून चर्चा केली तर मी माङो मत मांडेन. पण काही गोष्टीत आपण मर्यादा पाळायला शिकलं पाहिजे.
लोकसभेनंतर जनतेला एकाच पक्षाचे सरकार हवे आहे. आघाडय़ांचे राजकारण नको आहे, असे वाटत नाही?
- लोकांना कोणाचं तरी एकाचे सरकार असावे असे वाटते. राज्यात एकीकडे आघाडी आहे दुसरीकडे युती आहे. म्हणूनच माङो मत आहे की आपापला नेता निवडावा आणि जो कोणी तुम्हाला चांगले मजबूत आणि गतिमान प्रशासन देऊ शकेल यावर जनतेचा कौल मागावा. 15 दिवसांत अधिवेशन संपेल. त्यानंतर बसून आम्ही काय ते ठरवू. 
जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत असेही पवार म्हणाले होते..
 - हो मी देखील माङया कानांनी तसेच ऐकले आहे. त्यामुळे आता त्यांच्यापुढे दुसरे कोण असणार आहे.
एवढय़ा दारुण पराभवानंतर मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती बदललेली आहे असे वाटते.
- नाही वाटत.
 
शिवसेनेला उद्धव ठाकरे, मनसेला राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावे वाटतात. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना पुढे करण्याचे ठरवले आहे. आपली भूमिका काय आहे?
- पक्ष स्थापनेपासून असे निर्णय बहुमताचा आदर करुन घेतले गेले. याआधी छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर.आर. पाटील, पुन्हा भुजबळ आणि नंतर माङयावर आमदारांनी विश्वास दाखवत नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली. सगळेच पक्ष नेता प्रोजेक्ट करुन मैदानात उतरणार असतील तर काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील तसा विचार केला पाहिजे. अर्थात मी एकटा म्हणून उपयोग नाही. राज्याराज्यात निवडणुका नेता प्रोजेक्ट करुनच झाल्या आहेत. चंद्राबाबू, जगनमोहन रेड्डी, जयललिता, ममता बॅनर्जी, शिवराजसिंह, नवीन पटनायक, शीला दीक्षित, अरविंद केजरीवाल, डॉ. हर्षवर्धनर्पयत अनेक उदाहरणं सांगता येतील. जनताच आता समर्थ नेतृत्व कोण देऊ शकेल, याचा विचार करु लागली आहे.

Web Title: First choose the leader, then fight the elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.