शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी मार्केटला गुन्हेगारांचा विळखा

By admin | Updated: August 15, 2016 03:39 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला

नामदेव मोरे,

नवी मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. गांजा, गुटखा, दारूच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडले आहेत. आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या मार्केटमध्ये जानेवारी २०१४ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकीही सापडला होता. परंतु यानंतरही येथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये व प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षाला १५ हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष व ५ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातून व विदेशातून कृषी माल या मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख व रोज होणारी करोडो रूपयांची उलाढाल यामुळे एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईमध्ये गांजा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट मार्केटमध्ये सुरू आहे. राजा, दत्तात्रय विधाते, पप्पू , राकेश यादव असे अनेक गांजा विक्रेते थेट मार्केटमध्ये विक्री करत आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गुटखा विक्री असली तरी एपीएमसीच्या प्रत्येक टपरीवर माणिकचंदसह सर्व प्रकारचा गुटखा सहजपणे उपलब्ध असतो. भाजी मार्केट व विस्तारीत भाजी मार्केटच्या मधील रोडवर रोज पहाटे राकेश व त्याचे इतर तीन भाऊ हे बिनधास्तपणे गुटखा विकत असतात. एक भाऊ दारूविक्री करत असून उर्वरित येथे इतर व्यवसाय करणाऱ्यांकडून पैसे वसुलीचे काम करत आहेत. फळ मार्केटमध्ये टेंपोमध्ये जुगाराचे अड्डे सुरू आहेत. चोरी, खून, दरोडे, बनावट नोटा व इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना अनेक वेळा मार्केटमधून अटक केली आहे. बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वात मोठे आश्रयस्थान म्हणूनही एपीएमसी मार्केटची ओळख झाली आहे. पश्चिम बंगालमधून बांगलादेशी येथे कामानिमित्त येत आहेत. २००६ पासून जवळपास ४०० बांगलादेशी नागरिकांना मार्केटमधून अटक केली आहे. भरत शेळके एपीएमसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना एकाच वेळी १०० पेक्षा जास्त बांगलादेशी अटक केली होती. तीन महिन्यापूर्वीही येथून १४ बांगादेशींना अटक केली आहे. २०१२ मध्ये मुंबईमध्ये बनावट नोटा चलनात आणणारी टोळी अटक केली होती. ही टोळी एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये नकली नोटा देवून फळ खरेदी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. परंतु यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय कामगारांविरोधात काहीही ठोस कारवाई केली जात नाही. गुन्हेगारांनी मार्केटमध्ये आश्रय घेण्यास सुरवात केली असल्यामुळे एपीएमसीबरोबर देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह आहे. अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्नही दक्ष नागरिक विचारत आहेत. >बनावट तेल ते चंदन तस्कर१९ आॅक्टोबर २००६ मध्ये मसाला मार्केटमध्ये गोदरेजचा लोगो बनावट तेलाच्या बॉटलवर लावून विक्री करणारी टोळी पकडली होती. पाच जणांना अटक करून ३०० लिटर तेल जप्त केले होते. ९ डिसेंबर २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा नुरमोहम्मद शेख हाही एपीएमसीमध्येच कार्यरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. याशिवाय २७ नोव्हेंबर २०१४ मध्ये ५ कोटी रूपयांचे चंदन सापडले होते. मे २०१६ मध्ये गुजरात पोलिसांनी ट्रक चोरी करणारे आरोपी अटक करून २९ ट्रक जप्त केले होते. या आरोपींचेही एपीएमसी कनेक्शन उघड झाले होते.