शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
7
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
8
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
9
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
10
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
11
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
12
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
13
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
14
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
16
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
17
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
18
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
19
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
20
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार

एपीएमसी मार्केटला गुन्हेगारांचा विळखा

By admin | Updated: August 15, 2016 03:39 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला

नामदेव मोरे,

नवी मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. गांजा, गुटखा, दारूच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडले आहेत. आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या मार्केटमध्ये जानेवारी २०१४ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकीही सापडला होता. परंतु यानंतरही येथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये व प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षाला १५ हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष व ५ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातून व विदेशातून कृषी माल या मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख व रोज होणारी करोडो रूपयांची उलाढाल यामुळे एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईमध्ये गांजा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट मार्केटमध्ये सुरू आहे. राजा, दत्तात्रय विधाते, पप्पू , राकेश यादव असे अनेक गांजा विक्रेते थेट मार्केटमध्ये विक्री करत आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गुटखा विक्री असली तरी एपीएमसीच्या प्रत्येक टपरीवर माणिकचंदसह सर्व प्रकारचा गुटखा सहजपणे उपलब्ध असतो. भाजी मार्केट व विस्तारीत भाजी मार्केटच्या मधील रोडवर रोज पहाटे राकेश व त्याचे इतर तीन भाऊ हे बिनधास्तपणे गुटखा विकत असतात. एक भाऊ दारूविक्री करत असून उर्वरित येथे इतर व्यवसाय करणाऱ्यांकडून पैसे वसुलीचे काम करत आहेत. फळ मार्केटमध्ये टेंपोमध्ये जुगाराचे अड्डे सुरू आहेत. चोरी, खून, दरोडे, बनावट नोटा व इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना अनेक वेळा मार्केटमधून अटक केली आहे. बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वात मोठे आश्रयस्थान म्हणूनही एपीएमसी मार्केटची ओळख झाली आहे. पश्चिम बंगालमधून बांगलादेशी येथे कामानिमित्त येत आहेत. २००६ पासून जवळपास ४०० बांगलादेशी नागरिकांना मार्केटमधून अटक केली आहे. भरत शेळके एपीएमसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना एकाच वेळी १०० पेक्षा जास्त बांगलादेशी अटक केली होती. तीन महिन्यापूर्वीही येथून १४ बांगादेशींना अटक केली आहे. २०१२ मध्ये मुंबईमध्ये बनावट नोटा चलनात आणणारी टोळी अटक केली होती. ही टोळी एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये नकली नोटा देवून फळ खरेदी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. परंतु यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय कामगारांविरोधात काहीही ठोस कारवाई केली जात नाही. गुन्हेगारांनी मार्केटमध्ये आश्रय घेण्यास सुरवात केली असल्यामुळे एपीएमसीबरोबर देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह आहे. अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्नही दक्ष नागरिक विचारत आहेत. >बनावट तेल ते चंदन तस्कर१९ आॅक्टोबर २००६ मध्ये मसाला मार्केटमध्ये गोदरेजचा लोगो बनावट तेलाच्या बॉटलवर लावून विक्री करणारी टोळी पकडली होती. पाच जणांना अटक करून ३०० लिटर तेल जप्त केले होते. ९ डिसेंबर २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा नुरमोहम्मद शेख हाही एपीएमसीमध्येच कार्यरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. याशिवाय २७ नोव्हेंबर २०१४ मध्ये ५ कोटी रूपयांचे चंदन सापडले होते. मे २०१६ मध्ये गुजरात पोलिसांनी ट्रक चोरी करणारे आरोपी अटक करून २९ ट्रक जप्त केले होते. या आरोपींचेही एपीएमसी कनेक्शन उघड झाले होते.