शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘फायनान्स’ने यंदाचा उन्हाळा सुसह्य!

By admin | Updated: March 5, 2015 00:01 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच कूलर, ए.सी., फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे.

विजयकुमार सैतवाल ल्ल जळगावउन्हाळ्याची चाहूल लागताच कूलर, ए.सी., फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. यंदा तर विविध कंपन्यांनी शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य योजना देऊ केल्याने कूलरपेक्षा ए.सी.ला अधिक पसंती असल्याचे बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे ‘फायनान्स’ने यंदाचा उन्हाळा सुसह्य होणार असल्याचे चित्र आहे.आग ओकणारा सूर्य व अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी कूलर, ए.सी., फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून उन्हाच्या दाहकतेपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या कंपन्यांचे कूलर अथवा डेझर्ट (बाहेर खिडकीत बसविण्याचे)ला अधिक पसंती दिसून येते. यंदा मात्र उलट चित्र आहे. वाढती स्पर्धा व नवनवीन तंत्रज्ञान यामुळे या कंपन्या वेगवेगळ्या योजना राबवितात. अशाच प्रकारे यंदा जवळजवळ सर्वच कंपन्या कोणतीही रक्कम (डाऊन पेमेंट) न भरता शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य (फायनान्स) देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. ए.सी.वरसुद्धा अर्थसाह्य मिळत असल्याने ग्राहकांचा कल यंदा ए.सी.कडे दिसून येत आहे. शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य तर आहेच, शिवाय ए.सी.ला वारंवार पाणी टाकणे, विजेच्या धक्क्याची भीती नाही, जागेचा प्रश्न व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकदा वातावरण थंड (कूलिंग) झाले की, ए.सी. आपोआप बंद होतो. या सर्व कारणांमुळेही ए.सी.ला पसंती वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पाऊण टन ते १६ टनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ए.सी. बाजारात उपलब्ध असून गरजेनुसार त्यांना मागणी आहे. उन्हाळ्यात कोणतीही वस्तू घेतली तरी विजेच्या भारनियमनामुळे काही उपयोग होत नाही म्हणून अनेक कंपन्यांनी इन्व्हर्टरवर चालणारा ए.सी.सुद्धा बाजारात आणल्याने ए.सी.कडे कल वाढत आहे. पंखे पडले मागे४उन्हाळ्यामध्ये साधारणत: पंख्यांना मागणी असायची. मात्र, सध्या वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात पंखे परिणामकारक ठरत नसल्याने कूलर, ए.सी. यांना जास्त मागणी आहे. त्यामुळे पंख्यांची मागणी घटली आहे. ४कूलर, ए.सी., फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये यंदा चार ते पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. याला कारण सांगितले जात आहे ते म्हणजे या वस्तूंमध्ये वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम.कोणतेही डाऊन पेमेंट नाही व शून्य टक्के व्याजदरावर अर्थसाह्य उपलब्ध असल्याने सध्या ग्राहकांचा कूलरपेक्षा ए.सी.कडे अधिक कल आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर इतरही वस्तूंना मागणी वाढली आहे. -दिनेश पाटील, विक्रेते, जळगावभारनियमनाच्या वाढत्या समस्येमुळे इन्व्हर्टरवर चालणारे ए.सी. बाजारात आले आहेत. शिवाय ए.सी.ला पाणी टाकणे व विजेच्या धक्क्याची भीती नाही. या सुविधेसह फायनान्समुळे ए.सी.ची मागणी जास्त आहे. -महेंद्र ललवाणी, विक्रेते, जळगाव