शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सर्व विभागांच्या खर्चाला वित्त विभागाची कात्री, आमदार निधीतील कामांचे अधिकार वित्त विभागाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 05:10 IST

वित्त विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार या काळात कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्पीय वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होत होतो.

मुंबई : राज्याच्या वित्त विभागाने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२० पर्यंत विविध विभागांच्या खर्चांवर काही बंधने आणत एकप्रकारे कात्री लावली आहे. वित्त विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार या काळात कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये, असे स्पष्ट केले आहे.अर्थसंकल्पीय वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होत होतो. त्यामुळे अनावश्यक अथवा प्राधान्यक्रम नसणाऱ्या बाबींवरील खर्च निर्धारित व नियमित करण्याच्या दृष्टीने आदेश काढल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.सर्व प्रशासकीय विभागांनी ३१ मार्चपर्यंत कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये. तसेच, विद्यमान फर्निचरची दुरुस्ती, झेरॉक्स मशीन, संगणक, उपकरणे अथवा त्यांचे सुटे भाग यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, नैमित्तिक कार्यशाळा, चर्चासत्र व भाड्याने कार्यालय घेण्याचे प्रस्ताव यांना मंजुरी देऊ नये. तसेच, अशा प्रकारच्या खरेदीचे प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करू नयेत, असे बजावले आहे.उपलब्ध निधीच्या मर्यादेमधील औषध खरेदीची बाब यास अपवाद राहील. केंद्रीय योजना व त्यास अनुरुप राज्य हिस्सा तसेच बाह्य सहाय्यित प्रकल्पांसाठी खरेदीच्या प्रस्तावांनादेखील सदर निर्बंध लागू राहणार नाहीत. जिल्हा वार्षिक योजना तसेच लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीमधून (आमदार निधी) खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करता येतील. मात्र, निर्णय घेण्याचे अधिकार वित्त विभागाचे राहतील.चालू आर्थिक वर्षात कार्यालयाच्या दैनंदिन वापरातील उपभोग्य वस्तूंच्या मर्यादित खरेदीसाठी सदर निर्बंध लागू राहणार नाहीत.निविदांची प्रसिद्धी नाही१ फेब्रुवारी २०२० नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही. प्रशासकीय मान्यत असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय