शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

अखेर डीजीपींच्या निवडीसाठीचा प्रस्ताव पुन्हा यूपीएससीकडे, राज्य सरकारकडून चौथ्यांदा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:30 IST

DGP : सात महिन्यांपासून पोलीस महासंचालक (डीजीपी) पदाचा अतिरिक्त कार्यभार ३ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून संजय पांडे यांच्याकडे पदभार आहे.

- जमीर काझी

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात पूर्णवेळ प्रमुखाची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीकडे राज्य सरकारकडून नुकताच नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या ५ महिन्यांत विविध दुरुस्त्या करून तो चौथ्यांदा पाठविला आहे.सात महिन्यांपासून पोलीस महासंचालक (डीजीपी) पदाचा अतिरिक्त कार्यभार ३ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून संजय पांडे यांच्याकडे पदभार आहे. यूपीएससीकडून होणाऱ्या नियुक्तीवरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रस्तावातील १९ वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी त्यांनी सुचविलेल्या ३ जणांच्या यादीत त्यांचे नाव असल्यास त्यांना या पदावर काम करता येईल. अन्यथा सरकारला अन्य अधिकाऱ्यांची निवड करावी लागेल.पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्याने ७ जानेवारीला त्यांचा तात्पुरता पदभार तत्कालीन ‘एल अँड टी’चे प्रमुख हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर युपीएससीकडे नियुक्तीबाबतचा प्रस्ताव पाठविण्यापूर्वींच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ मिळालेल्या स्काॅर्पिओतील जिलेटिन कांड्यांच्या घटनेमुळे पोलीस दलात ‘ट्रान्स्फर स्फोट’ झाला. त्यानंतर मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून नगराळे यांची त्यांच्याजागी निवड केली, तर एसीबीचे प्रमुख रजनीश सेठ यांच्याकडे डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार दिला. त्याबाबतचा प्रस्ताव यूपीएससीकडे पाठविला होता. मात्र पांडे यांनी, डावलल्याबद्दल कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सरकारने ९ एप्रिलला त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला. या सर्व घडामोडीनंतर राज्य सरकारने मेमध्ये पाठविलेल्या प्रस्तावात जायसवाल व रश्मी शुक्ला यांची नावे नसल्याबद्दल खुलासा विचारला. त्यानंतर पुन्हा नगराळे यांच्याबद्दल व अन्य काही त्रुटींबद्दलची माहिती मागविली. त्यानंतर ३० वर्षे सेवा झालेल्या सर्व अधिकाऱ्यांची नावे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पुन्हा १९९१ पर्यंतच्या आयपीएस बॅचच्या अधिकाऱ्यांचा अद्ययावत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

पांडे यांच्या नावावर एकदा फुलीसुबोध जायसवाल यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये डीजीपीच्या नियुक्तीवेळी तत्कालीन फडणवीस सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावेळी यूपीएससीने संजय पांडे यांना वगळून अन्य तीन नावांना पसंती दिली होती. त्यामुळे आता निवड समिती काय निर्णय घेते, त्यांना पुन्हा वगळते का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस