शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

महाआघाडीचा अंतिम निर्णय होणार दिल्लीत, घटकपक्षांना तीन जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:13 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. याबाबतच्या चर्चेत शुक्रवारी घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दाखवितानाच, एमआयएमला सोडचिठ्ठी दिली, तरच भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाआघाडीबाबत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी जागावाटप आणि जागांच्या अदलाबदलीविषयी चर्चा झाली. घटकपक्षांसाठी पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडी, अकोला लोकसभा भारिप बहुजन महासंघ आणि हातकणंगले मतदार संघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याबाबत चर्चा झाली. मात्र, प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत यायचे असेल, तर एमआयएमची साथ सोडावी लागणार आहे. आंबेडकर यांनी मात्र अद्याप यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखविली असली, तरी अन्य पक्षांनी अधिक जागांसाठी आग्रह धरला आहे. आरपीआय गवई गटाच्या राजेंद्र गवई यांनी अमरावतीसाठी आग्रह धरला आहे. मात्र, पंजा किंवा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची तयारी असेल, तरच जागा सोडू, अशी भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किमान समान कार्यक्रमाबाबत आग्रह धरला आहे. शेकाप, डाव्या संघटना, लोकतांत्रिक जनता दल आदींना विधानसभेसाठी संधी देण्याची चर्चा झाली.राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चामहाआघाडीची राज्य पातळीवरील चर्चा संपली आहे. आता महाआघाडीबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. महाआघाडीबाबत जी चर्चा झाली, ती आम्ही पक्ष प्रभारींना सांगू. प्रकाश आंबेडकरांबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आाहे. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चा होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस