शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीचा अंतिम निर्णय होणार दिल्लीत, घटकपक्षांना तीन जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:13 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. याबाबतच्या चर्चेत शुक्रवारी घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दाखवितानाच, एमआयएमला सोडचिठ्ठी दिली, तरच भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाआघाडीबाबत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी जागावाटप आणि जागांच्या अदलाबदलीविषयी चर्चा झाली. घटकपक्षांसाठी पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडी, अकोला लोकसभा भारिप बहुजन महासंघ आणि हातकणंगले मतदार संघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याबाबत चर्चा झाली. मात्र, प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत यायचे असेल, तर एमआयएमची साथ सोडावी लागणार आहे. आंबेडकर यांनी मात्र अद्याप यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखविली असली, तरी अन्य पक्षांनी अधिक जागांसाठी आग्रह धरला आहे. आरपीआय गवई गटाच्या राजेंद्र गवई यांनी अमरावतीसाठी आग्रह धरला आहे. मात्र, पंजा किंवा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची तयारी असेल, तरच जागा सोडू, अशी भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किमान समान कार्यक्रमाबाबत आग्रह धरला आहे. शेकाप, डाव्या संघटना, लोकतांत्रिक जनता दल आदींना विधानसभेसाठी संधी देण्याची चर्चा झाली.राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चामहाआघाडीची राज्य पातळीवरील चर्चा संपली आहे. आता महाआघाडीबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. महाआघाडीबाबत जी चर्चा झाली, ती आम्ही पक्ष प्रभारींना सांगू. प्रकाश आंबेडकरांबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आाहे. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चा होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस