शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

महाआघाडीचा अंतिम निर्णय होणार दिल्लीत, घटकपक्षांना तीन जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:13 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. याबाबतच्या चर्चेत शुक्रवारी घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दाखवितानाच, एमआयएमला सोडचिठ्ठी दिली, तरच भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाआघाडीबाबत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी जागावाटप आणि जागांच्या अदलाबदलीविषयी चर्चा झाली. घटकपक्षांसाठी पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडी, अकोला लोकसभा भारिप बहुजन महासंघ आणि हातकणंगले मतदार संघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याबाबत चर्चा झाली. मात्र, प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत यायचे असेल, तर एमआयएमची साथ सोडावी लागणार आहे. आंबेडकर यांनी मात्र अद्याप यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखविली असली, तरी अन्य पक्षांनी अधिक जागांसाठी आग्रह धरला आहे. आरपीआय गवई गटाच्या राजेंद्र गवई यांनी अमरावतीसाठी आग्रह धरला आहे. मात्र, पंजा किंवा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची तयारी असेल, तरच जागा सोडू, अशी भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किमान समान कार्यक्रमाबाबत आग्रह धरला आहे. शेकाप, डाव्या संघटना, लोकतांत्रिक जनता दल आदींना विधानसभेसाठी संधी देण्याची चर्चा झाली.राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चामहाआघाडीची राज्य पातळीवरील चर्चा संपली आहे. आता महाआघाडीबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. महाआघाडीबाबत जी चर्चा झाली, ती आम्ही पक्ष प्रभारींना सांगू. प्रकाश आंबेडकरांबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आाहे. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चा होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस