शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

परीक्षेबाबत अंतिम निर्णय कुलपतींचाच; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 06:53 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा आणि शैक्षणिक वर्षाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरुंची समिती नेमली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल विभागाच्या सचिवांना सादर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठ परिक्षांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ताठर भूमिका घेतली आहे. परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा अनपेक्षित आणि प्रथेला धरून नाही. शिवाय, या निर्णयाचे परिणाम आणि कायदेशीर बाबींचा सर्वंकष विचार झालेला नाही, असे सांगतानाच कुलपतीच परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्रच मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा आणि शैक्षणिक वर्षाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरुंची समिती नेमली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. हा अहवाल अजूनही कुलपती या नात्याने कुलपतींना सादर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणज,े व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व कुलगुरूंनी आपापल्या परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती, याची आठवणही राज्यपालांनी करुन दिली. परिक्षेबाबत या समितीच्या अहवाल आपल्याला सादर झाल्यानंतरच या अहवालातील सर्व शिफारशी अथवा काही स्वीकारून निर्देश जारी केले जातील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची केलेली घोषणा ही पदवी परीक्षेबाबतच्या मुलभूत सुत्राला हरताळ फासणारी आहे. एकाच प्रकारची पदवी मिळविण्यासाठी दोन प्रकारचे, वेगवेगळे नियम असू शकत नाहीत. एकाने परिक्षा द्यायची आणि दुसऱ्याने सरासरीच्या आधारे पदवी मिळवायची, असा भेद करता येणार नाही. परीक्षेला पर्यायी प्रक्रिया ठरविता येणार नाही, असेही राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यवसायातील मंडळात नोंदणी करावी लागते. परीक्षा झाली नाही तर या संस्था अशा विद्यार्थ्यांना स्वीकारणार नाहीत. त्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यता येईल, याकडेही राज्यपालांनी लक्ष वेधले आहे.मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतिक्षाराज्यपाल हे राज्यातील विद्यापीठांचे कुलपतीदेखील आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाशी संबंधित सर्व निर्णयांचे अंतिम अधिकार हे कुलपतींकडे आहेत. याच कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून विद्यापीठ परिक्षांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देतात याची प्रतिक्षा आहे.

टॅग्स :examपरीक्षाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे