शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

छुप्या कॅमेऱ्याद्वारे टवाळखोरांचे चित्रीकरण

By admin | Updated: August 24, 2016 01:19 IST

महिला, मुलींच्या प्रभावी सुरक्षेसाठी आता पुणे विभागात पोलिसांच्या वतीने ‘निर्भया’ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

बारामती : महिला, मुलींच्या प्रभावी सुरक्षेसाठी आता पुणे विभागात पोलिसांच्या वतीने ‘निर्भया’ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकाची शहरातील रोडरोमिओ, टवाळखोरांवर नजर राहणार आहे. छुप्या कॅमेऱ्याद्वारे टवाळखोरांचे चित्रीकरण होणार असून, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी याबाबत माहिती दिली.बारामती येथे आयोजित पोलिसांच्या कार्यक्रमात डॉ. जाधव यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. जाधव म्हणाले, ‘‘विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दामिनी पथकाच्या कारवाईनंतर मुली तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करीत. तर एखाद्या मुलीने तक्रार दिल्यास पालक विरोध करीत असत. मात्र, निर्भया पथक कपड्यांमध्ये छुपे कॅ मेरे लावून फिरणार आहे. शिवाय हे पथक पोलिसांच्या गणवेशात नसून साध्या वेशात फिरणार आहे. त्यामुळे पोलीस असल्याचा संशयदेखील कोणाला येणार नाही. कॅमेरे लावून गर्दीच्या ठिकाणी पथक फिरणार आहे. त्यानंतर रात्री कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलेले शूटिंग तपासण्यात येईल. त्या चित्रीकरणामध्ये छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जाईल. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेतील. विवाहित पुरुष असल्यास त्याच्या पत्नीला, तर मुलगा असल्यास त्याच्या आईला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात येईल. त्यांना चित्रीकरण दाखवून पहिल्या वेळी ताकीद देण्यात येईल. मात्र, दुसऱ्या वेळी हा प्रकार झाल्यास मात्र कडक पोलीस कारवाई क्रमप्राप्त ठरेल. या पथकाला खासगी वाहन दिले जाणार आहे. कॅमेरे थोड्याच दिवसांत उपलब्ध होतील. मात्र, खासगी वाहन उपलब्ध करण्यासाठी बारामती शहरातील दानशुरांनी पुढाकार घ्यावा.’’>1091 महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइनमहिलांसाठी १०९१ स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. पूर्वी एकच हेल्पलाइन होती. त्यावर संपर्क साधल्यानंतर पोलीस आयुक्तालयात फोन जात असत. आता मात्र स्वतंत्र लाइन असणार आहे. त्यावर येणारे कॉल ‘रेकॉर्ड’ करण्यात येतील. त्यासाठी स्वतंत्र महिला अधिकारी नेमणूक केली जाईल. तसेच, कॉल घेतल्यानंतर आवश्यक ठिकाणी पोलीस जाऊन कारवाई करतील, असे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी सांगितले. >१४० जोडप्यांचे संसार टिकविण्यात यश...विवाहितेला त्रास दिल्याप्रकरणी ३९० तक्रारी ग्रामीण पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी महिला दक्षता समिती, पोलीस, समुपदेशनाच्या माध्यमातून १४० संसार टिकविण्यात यश आले. हे संसार कागदोपत्री टिकविले जात नाहीत, तर पोलीस अचानक घरी भेट देऊन निरीक्षण करतात. खरी परिस्थिती पाहिली जाते. या १४० जोडप्यांचा पोलिसांच्या ‘नांदा सौख्य भरे’ कार्यक्रमात सत्कार करण्यात आला, अशी माहिती कार्यक्रमात डॉ. जय जाधव यांनी दिली.