शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:09 IST

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा,

मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.एका ८४ वर्ष वयाच्या शेतकºयाला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. त्यांनी मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही.तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षातसाडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर विश्वास नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.मंत्र्यांनी जमीनखरेदी केलीच कशी?धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकºयाने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का? असा सवाल करुन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन कशी खरेदी करू शकतात, असा सवाल विखे पाटील यांनी केला.रावल यांनी खरेदीकेलेल्या जमिनीची चौकशी करा-राष्ट्रवादीसरकारी प्रकल्प असणाºया गावातील जमिनी कवडीमोलाने खरेदी करून त्या महागड्या दरात विकण्याचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा धंदाच असून त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून केली आहे.जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे.- खा. सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी काँग्रेसही आत्महत्या नाही तर हत्या असून त्यास सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्य सरकारला कलंक लावणारा हा प्रकार आहे. शेतकºयांचा आक्रोशही सरकारला ऐकू येत नाही. विकास हवा आहे पण शेतकºयांचे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील तर असा विकास नको.- खा. संजय राऊत, शिवसेनाअन् शासकीय यंत्रणा झाली गतिमानफेरमूल्यांकन सुरू: प्रशासन खडबडून जागेधुळे : विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून विखरण व मेथी शिवारात संपादित केलेल्या १९९ हेक्टर जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. पण सरकारची ही कृती उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी भावना गावकºयांनी व्यक्त केली.जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी आज दिवसभरात या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्याचा अहवाल मंगळवारी मंत्रालयात होणाºया बैठकीत सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाच्या सह्यासुद्धा नाहीत. जमीन मालकाची सही नाही. यावरून कृषी अधिकाºयांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले, हे सिद्ध होत आहे, असा खळबळजनक आरोप धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDharma Patilधर्मा पाटीलfarmer suicideशेतकरी आत्महत्या