शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:09 IST

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा,

मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.एका ८४ वर्ष वयाच्या शेतकºयाला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. त्यांनी मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही.तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षातसाडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर विश्वास नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.मंत्र्यांनी जमीनखरेदी केलीच कशी?धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकºयाने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का? असा सवाल करुन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन कशी खरेदी करू शकतात, असा सवाल विखे पाटील यांनी केला.रावल यांनी खरेदीकेलेल्या जमिनीची चौकशी करा-राष्ट्रवादीसरकारी प्रकल्प असणाºया गावातील जमिनी कवडीमोलाने खरेदी करून त्या महागड्या दरात विकण्याचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा धंदाच असून त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून केली आहे.जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे.- खा. सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी काँग्रेसही आत्महत्या नाही तर हत्या असून त्यास सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्य सरकारला कलंक लावणारा हा प्रकार आहे. शेतकºयांचा आक्रोशही सरकारला ऐकू येत नाही. विकास हवा आहे पण शेतकºयांचे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील तर असा विकास नको.- खा. संजय राऊत, शिवसेनाअन् शासकीय यंत्रणा झाली गतिमानफेरमूल्यांकन सुरू: प्रशासन खडबडून जागेधुळे : विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून विखरण व मेथी शिवारात संपादित केलेल्या १९९ हेक्टर जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. पण सरकारची ही कृती उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी भावना गावकºयांनी व्यक्त केली.जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी आज दिवसभरात या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्याचा अहवाल मंगळवारी मंत्रालयात होणाºया बैठकीत सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाच्या सह्यासुद्धा नाहीत. जमीन मालकाची सही नाही. यावरून कृषी अधिकाºयांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले, हे सिद्ध होत आहे, असा खळबळजनक आरोप धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDharma Patilधर्मा पाटीलfarmer suicideशेतकरी आत्महत्या