विदर्भाचा हा लढा अंतिम - अणे
By Admin | Updated: March 30, 2016 00:39 IST2016-03-30T00:39:57+5:302016-03-30T00:39:57+5:30
ज्वाला भडकणारच, आम्ही आहुती देण्यास तयार आहोत. भिवंडीत पॉवरलूम तर विदर्भाच्या वाट्याला हॅण्डलूम येते; याला दुजाभाव नाही तर काय समजायचे? विदर्भ स्वतंत्र होेणार नाही

विदर्भाचा हा लढा अंतिम - अणे
वर्धा : ज्वाला भडकणारच, आम्ही आहुती देण्यास तयार आहोत. भिवंडीत पॉवरलूम तर विदर्भाच्या वाट्याला हॅण्डलूम येते; याला दुजाभाव नाही तर काय समजायचे? विदर्भ स्वतंत्र होेणार नाही तोपर्यंत विकास होणारच नाही. हा लढा अंतिम समजून लढावा लागेल, असे मत माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी येथील अग्निहोत्री महाविद्यालयातील सभेत व्यक्त केले.
स्वराज्याकरिता सेवाग्राम येथून सत्याग्रहाची सुरुवात व्हायची. वर्धा येथूनच विदर्भाच्या लढ्याला सत्याग्रह समजण्याचे आवाहनही अणे यांनी केले. (प्रतिनिधी)