शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

Maha Vikas Aghadi: शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 10:57 IST

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडीला धक्का दिला आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपा शिंदे गटाच्या सहाय्यानं सत्तेत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्यात भाजपाला यश आलं आहे. यातच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीतील दूरी आणखी वाढल्याचं दिसून येत आहे. कारण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसल आपला उमेदवार द्यायचा होता. पण बैठकीत तडजोड झाली आणि शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरविण्यात आलं. 

विधानसभा अध्यक्ष निवडणूक LIVE UPDATES येथे क्लिक करा

भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला होतं. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बैठकीत शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरलं आणि यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यंत्री अजित पवार देखील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्या बंडात भाजपाचा काही हात नाही असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांना राज्याबाहेरील घडामोडींची माहिती नसते असं विधान करत घरचा आहेस दिला होता. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यातच शिवसेना पक्षाला फुटीचं ग्रहण लागलेलं असताना शरद पवार यांनीही महाविकास आघाडी वाचविण्यासाठी फारसा रस दाखवला नाही अशाही बातम्या समोर आल्या होत्या. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन दिला जात नाही अशी ओरड शिवसेना आमदारांची होती. याबाबतही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. राष्ट्रवादीने शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कॅमेऱ्यासमोर येऊन १० मिनिटांचा बाईट दिला. यात त्यांनी कोणत्या विभागाला किती निधी दिला याची आकडेवारीच मांडली आणि शिवसेना आमदारांचे आरोप फेटाळून लावले होते. हेच स्पष्टीकरण राष्ट्रवादीला याआधीही देता आलं असतं पण शिवसेना फुटल्यानंतरच जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजेच शिवसेना आमदारांच्या आरोपांची खदखद राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही होती हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अजित पवारांबाबत निधी वाटपाच्या तक्रारी असल्याचं विधान करत धक्का दिला होता. नाना पटोलेंच्या विधानामुळे अजित पवार यांचा चांगलाच संताप झाला होता. तसंच शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसमधील काही आमदार देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यामुळे तातडीची पावलं उचलत केंद्रानं कमलनाथ यांना राज्यात पाठवण्यात आलं होतं. पण तेही दोन दिवसांत आमदारांशी चर्चा करून माघारी परतले होते. काँग्रेसचे आमदार भाजपाच्या गोटात जाऊ नयेत यासाठी काँग्रेसकडून काळजी घेण्यात आली होती. 

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे आणि भाजपा सत्तेत आल्यामुळे महाविकास आघाडीची मोट कमकुवत करण्यास भाजपासाठी अधिक सोपं ठरू शकेल. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता भाजपाच्या टार्गेटवर असेल जणेकरुन महाविकास आघाडीला सुरुंग लावता येईल. यातच विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना