शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

Maha Vikas Aghadi: शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 10:57 IST

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडीला धक्का दिला आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपा शिंदे गटाच्या सहाय्यानं सत्तेत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्यात भाजपाला यश आलं आहे. यातच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीतील दूरी आणखी वाढल्याचं दिसून येत आहे. कारण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसल आपला उमेदवार द्यायचा होता. पण बैठकीत तडजोड झाली आणि शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरविण्यात आलं. 

विधानसभा अध्यक्ष निवडणूक LIVE UPDATES येथे क्लिक करा

भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला होतं. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बैठकीत शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरलं आणि यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यंत्री अजित पवार देखील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्या बंडात भाजपाचा काही हात नाही असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांना राज्याबाहेरील घडामोडींची माहिती नसते असं विधान करत घरचा आहेस दिला होता. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यातच शिवसेना पक्षाला फुटीचं ग्रहण लागलेलं असताना शरद पवार यांनीही महाविकास आघाडी वाचविण्यासाठी फारसा रस दाखवला नाही अशाही बातम्या समोर आल्या होत्या. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन दिला जात नाही अशी ओरड शिवसेना आमदारांची होती. याबाबतही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. राष्ट्रवादीने शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कॅमेऱ्यासमोर येऊन १० मिनिटांचा बाईट दिला. यात त्यांनी कोणत्या विभागाला किती निधी दिला याची आकडेवारीच मांडली आणि शिवसेना आमदारांचे आरोप फेटाळून लावले होते. हेच स्पष्टीकरण राष्ट्रवादीला याआधीही देता आलं असतं पण शिवसेना फुटल्यानंतरच जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजेच शिवसेना आमदारांच्या आरोपांची खदखद राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही होती हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अजित पवारांबाबत निधी वाटपाच्या तक्रारी असल्याचं विधान करत धक्का दिला होता. नाना पटोलेंच्या विधानामुळे अजित पवार यांचा चांगलाच संताप झाला होता. तसंच शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसमधील काही आमदार देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यामुळे तातडीची पावलं उचलत केंद्रानं कमलनाथ यांना राज्यात पाठवण्यात आलं होतं. पण तेही दोन दिवसांत आमदारांशी चर्चा करून माघारी परतले होते. काँग्रेसचे आमदार भाजपाच्या गोटात जाऊ नयेत यासाठी काँग्रेसकडून काळजी घेण्यात आली होती. 

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे आणि भाजपा सत्तेत आल्यामुळे महाविकास आघाडीची मोट कमकुवत करण्यास भाजपासाठी अधिक सोपं ठरू शकेल. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता भाजपाच्या टार्गेटवर असेल जणेकरुन महाविकास आघाडीला सुरुंग लावता येईल. यातच विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना