शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

Maha Vikas Aghadi: शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 10:57 IST

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडीला धक्का दिला आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपा शिंदे गटाच्या सहाय्यानं सत्तेत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्यात भाजपाला यश आलं आहे. यातच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीतील दूरी आणखी वाढल्याचं दिसून येत आहे. कारण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसल आपला उमेदवार द्यायचा होता. पण बैठकीत तडजोड झाली आणि शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरविण्यात आलं. 

विधानसभा अध्यक्ष निवडणूक LIVE UPDATES येथे क्लिक करा

भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला होतं. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बैठकीत शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरलं आणि यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यंत्री अजित पवार देखील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्या बंडात भाजपाचा काही हात नाही असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांना राज्याबाहेरील घडामोडींची माहिती नसते असं विधान करत घरचा आहेस दिला होता. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यातच शिवसेना पक्षाला फुटीचं ग्रहण लागलेलं असताना शरद पवार यांनीही महाविकास आघाडी वाचविण्यासाठी फारसा रस दाखवला नाही अशाही बातम्या समोर आल्या होत्या. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन दिला जात नाही अशी ओरड शिवसेना आमदारांची होती. याबाबतही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. राष्ट्रवादीने शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कॅमेऱ्यासमोर येऊन १० मिनिटांचा बाईट दिला. यात त्यांनी कोणत्या विभागाला किती निधी दिला याची आकडेवारीच मांडली आणि शिवसेना आमदारांचे आरोप फेटाळून लावले होते. हेच स्पष्टीकरण राष्ट्रवादीला याआधीही देता आलं असतं पण शिवसेना फुटल्यानंतरच जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजेच शिवसेना आमदारांच्या आरोपांची खदखद राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही होती हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अजित पवारांबाबत निधी वाटपाच्या तक्रारी असल्याचं विधान करत धक्का दिला होता. नाना पटोलेंच्या विधानामुळे अजित पवार यांचा चांगलाच संताप झाला होता. तसंच शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसमधील काही आमदार देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यामुळे तातडीची पावलं उचलत केंद्रानं कमलनाथ यांना राज्यात पाठवण्यात आलं होतं. पण तेही दोन दिवसांत आमदारांशी चर्चा करून माघारी परतले होते. काँग्रेसचे आमदार भाजपाच्या गोटात जाऊ नयेत यासाठी काँग्रेसकडून काळजी घेण्यात आली होती. 

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे आणि भाजपा सत्तेत आल्यामुळे महाविकास आघाडीची मोट कमकुवत करण्यास भाजपासाठी अधिक सोपं ठरू शकेल. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता भाजपाच्या टार्गेटवर असेल जणेकरुन महाविकास आघाडीला सुरुंग लावता येईल. यातच विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना