शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

यवतमाळ येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 07:00 IST

साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत.

ठळक मुद्दे२८ आॅक्टोबरच्या बैठकीत सन्मानाने संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब साहित्य संस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश

पुणे : घटनादुरुस्तीत नमूद केल्याप्रमाणे साहित्य महामंडळाकडे सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून नावे प्राप्त झाली असून, २८ आॅक्टोबर रोजी होणार असलेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. साहित्य संस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या नऊ दशकांच्या इतिहासात अध्यक्षपदी महिला साहित्यिका विराजमान होणार का, याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला जाणार नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने एका नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०१८ सालच्या यवतमाळ येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर ही नावे पाठवण्यात आली आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाकडून डॉ. बाळ फोंडके, प्रेमानंद गज्वी आणि रामदास भटकळ, विदर्भ साहित्य संघाकडून डॉ. प्रभा गणोरकर आणि किशोर सानप, छत्तीसगडकडून प्रेमानंद गज्वी, गोमंतककडून सोमनाथ कोमरपंत, मध्य प्रदेशकडून भारत सासणे, बडोदे आणि तेलंगणातून डॉ. अरुणा ढेरे आणि कर्नाटकातून डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे महामंडळाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी डॉ. प्रेमानंद गज्वी यांचे नाव पाठवले आहे. या नावांबाबत चर्चा होऊन बहुमताचे एका नावाची निवड २८ आॅक्टोबरच्या बैठकीत सन्मानाने केली जाणार आहे........................मराठवाडा साहित्य परिषदेकडून नरेंद्र चपळगावकर, ना.धों.महानोर आणि प्रेमानंद गज्वी यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र नरेंद्र चपळगावकर आणि ना.धों.महानोर यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने परिषदेला नावे मागे घ्यावी लागली. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या नावांचा बैठकीत विचार केला जाणार नाही. -------------२०१० साली ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे झाले होते. उत्तम कांबळे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. त्यावेळी प्रभा गणोरकर निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. डॉ. अरुणा ढेरे यांनी आजवर निवडणूक लढवलेली नाही.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीliteratureसाहित्यAruna Dhereअरुणा ढेरेMaharashtraमहाराष्ट्र