शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वसंताच्या आगमनाचा रंगला फुलोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:19 IST

‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे.

नीलेश काण्णव,भीमाशंकर- ‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे. पोपटाच्या चोचीप्रमाणे असणारी ही फुले लांबून पाहिली असता जंगलातून लाल ज्वाला बाहेर येत असल्याचा भास होतो.शिशिराची गळती संपून वसंत पालवी झाडांना फुटू लागली आहे. वसंताच्या आगमनाबरोबर झाडांवर रंगीबेरंगी फुलांनी उधळण सुरू झाली आहे. कोकिळेची कुहूकुहू, पक्षांचा किलबिलाट, मधमाश्यांची गुणगुण याने आसमंत घुमू लागला आहे. पळस, काटेसावर, पांगारा, करपा अशा विविध फुलांनी डोंगरदऱ्या रंगून गेल्या आहेत. त्यात बहुउपयोगी असलेला पळस सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पळसाच्या पानाच्या पत्रावळी बनवतात, पळसाची वाळलेली फुले पाण्यात भिजून उतरलेला रंग कपडे रंगवण्यासाठी वापरतात, सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात, बियांचे तेलही काढतात.पळसाबरोबरच लालभडक काटेसावरीची फुले जंगलात प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करून घेत आहेत. सावरीच्या झाडाची पाने गळल्यानंतर टपोऱ्या कळ््या तयार होतात व याचे रूपांतर हाताच्या विताएवढ्या आकाराच्या फुलांमध्ये होते. या फुलांच्या तळाशी भरपूर पुष्परस असतो. त्यामुळे पक्षी, कीटक, मधमाश्या या झाडाला झोंबलेले असतात. फुले ताजी असतानाच खाली गळून पडतात व गळलेली फुले जंगली प्राणी खातात. फुले गळल्यानंतर बोंडे तयार होतात. हिरवी बोंडे तपकिरी होऊन उकलतात व त्यातून पांढरा कापूस निघतो. हा कापूस वाऱ्यावर उडताना ‘हिमवृष्टी’ होत असल्याचा भास होतो. पांगारा झाडाचा डेरेदार वृक्ष फुललेला असताना सगळ््यांचे लक्ष वेधून घेतो. पूर्ण फुलांनी भरलेले हे झाड जंगलामध्ये लांबून ज्वाळांचा भास देणारे, रंग भरणारे वाटते. उभ्या तिरप्या काटेरी फांद्यांवर खालून वर उमलत गेलेले दोन ते तीन फुलांचे गुच्छ लागलेले असतात. या फुलांमध्ये पाणी भरलेले असते व हे पाणी पक्षी उन्हाळ््यात पिण्यासाठी वापरतात. फुलांचा बहर संपत आल्यावर शेंगा येतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा विविध फुलांनी रंगून गेल्या आहेत. शहराबाहेर पडल्यानंतर काही ठिकाणी हे वृक्ष दिसतात; परंतु याचे खरे सौंदर्य पाहण्यासाठी जंगलाकडेच जावे लागते.