महिला शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 3, 2015 01:48 IST2015-06-03T01:48:03+5:302015-06-03T01:48:03+5:30
जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, सोमवारी ४५ वर्षीय महिला शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़

महिला शेतकऱ्याची आत्महत्या
वरुड (जि़ अमरावती): जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, सोमवारी ४५ वर्षीय महिला शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़
विजया देवीदास कडू (रा.कुरळी) असे या महिलेचे नाव आहे. तिच्या नावे ३ एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीच्या मशागतीकरिता महाराष्ट्र बँकेचे ५५ हजार रुपये, अमरावतीच्या एका बँकेचे एक लाख रुपयांसह अन्य बँकांचे असे एकूण ४ लाखांचे कर्ज आहे. गत वर्षीच्या हंगामात मिरचीचे पीक होते. परंतु रोगामुळे पूर्णत: बुडाले. ३ एकरमध्ये ८ क्विंटल कापूस झाला. सततची नापिकी असल्याने कर्जाचा भरणा ते करू शकले नाही. बँका, फायनान्स कंपनीचा तगादा असल्याने त्या त्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.