शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

विरोधकांना संपविण्याची वृत्ती घातक! देशाची प्रतिमा मलिन; हायकोर्टाने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 04:40 IST

विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.

मुंबई : विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे कुटुंबीय तसेच केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे झाली. केवळ विचारवंतच नव्हे तर उदारमतवादावर विश्वास ठेवणाºया व्यक्ती किंवा संस्थांनाही ‘लक्ष्य’ केले जाऊ शकते, अशी ही स्थिती असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणी सीबीआय व एसआयटीने कोर्टात अहवाल सादर केला. त्यावर तपास यंत्रणांच्या हाती काही ठोस लागले नसल्याचे कोर्टाने नमूद केले.तुम्ही मेहनत घेत असाल तरी मुख्य आरोपी फरार आहेत, हे सत्य आहे. प्रत्येक सुनावणीनंतर एक मोलाचा जीव जाईल. दुर्दैवाने गेल्याच महिन्यात उदारमतवादी विचाराचा (गौरी लंकेश) एक जीव बंगळुरूमध्ये गेला. भविष्यात कोणाचा बळी जाणार नाही, याची काय हमी? आरोपी चलाख असल्याने तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देशही मुंंबई उच्च न्यायालयाने दिले.सनातन संस्थेच्या भूमिकेचा तपास न केल्याचा आरोप दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने तपास झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टGovernmentसरकारBJPभाजपा