शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना संपविण्याची वृत्ती घातक! देशाची प्रतिमा मलिन; हायकोर्टाने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 04:40 IST

विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.

मुंबई : विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे कुटुंबीय तसेच केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे झाली. केवळ विचारवंतच नव्हे तर उदारमतवादावर विश्वास ठेवणाºया व्यक्ती किंवा संस्थांनाही ‘लक्ष्य’ केले जाऊ शकते, अशी ही स्थिती असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणी सीबीआय व एसआयटीने कोर्टात अहवाल सादर केला. त्यावर तपास यंत्रणांच्या हाती काही ठोस लागले नसल्याचे कोर्टाने नमूद केले.तुम्ही मेहनत घेत असाल तरी मुख्य आरोपी फरार आहेत, हे सत्य आहे. प्रत्येक सुनावणीनंतर एक मोलाचा जीव जाईल. दुर्दैवाने गेल्याच महिन्यात उदारमतवादी विचाराचा (गौरी लंकेश) एक जीव बंगळुरूमध्ये गेला. भविष्यात कोणाचा बळी जाणार नाही, याची काय हमी? आरोपी चलाख असल्याने तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देशही मुंंबई उच्च न्यायालयाने दिले.सनातन संस्थेच्या भूमिकेचा तपास न केल्याचा आरोप दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने तपास झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टGovernmentसरकारBJPभाजपा