शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण; मनोज जरांगे यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:45 IST

आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड ( Marathi News ): मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून आपण मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बीड येथील सभेत जाहीर केले. लाखो मराठा बांधव मुंबईत येणार असतील, तर त्यांना कसे अडवणार, असा सवालदेखील त्यांनी यावेळी विचारला.   

मराठा आरक्षणासाठी समाजाच्या वतीने राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर २३ डिसेंबर रोजी बीड येथील पाटील मैदानावर निर्णायक इशारा सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. शांततेचे ब्रह्मास्त्र सर्वांत मोठे आहे. स्वत:च्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात शांततेत सहभागी व्हा. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटायचे नाही, असे जरांगे म्हणाले. 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, सारथी, महामंडळाला बजेट द्या; तरच तुमचं आमचं जमणार, असे जरांगे यांनी राज्य सरकारला सभेतून सूचित केले. 

मुंबईला जाण्याची हौस नाही...

आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. जनभावना लक्षात घ्या. ३ महिने, ४० दिवस; नंतर दोन महिने व नंतर २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला. आम्ही सहन तरी किती दिवस करायचे? असा सवाल जरांगे यांनी केला. आंतरवालीपासून मुंबईपर्यंत मराठा समाज मला भेटायला मुंबईत येणार. तीन कोटींपेक्षा जास्त समाज मला भेटायला येणार. खाण्याची व पांघरायची व्यवस्था आम्ही आमची करू; फक्त प्रसाधनगृहांची सोय तेवढी करा, असे ते म्हणाले. मंत्री छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत जरांगे म्हणाले, सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्याचंच ऐकू नका; नाहीतर जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तोपर्यंत संयम राखावा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सर्वोच्च न्यायालय २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. वकिलांची फौज  सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. त्रुटी दूर केल्या जातील. राज्यात कायदा सुव्यवस्था, शांतता राहिली पाहिजे. आरक्षण मिळावे ही सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कोणीही घाईगडबडीने निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोणी आरे म्हटले तर कोणीतरी कारे करणारच आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतल्याने दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशीच आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालय अडथळा दूर करेल. - छगन भुजबळ, मंत्री.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेChhagan Bhujbalछगन भुजबळ