शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण; मनोज जरांगे यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:45 IST

आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड ( Marathi News ): मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून आपण मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बीड येथील सभेत जाहीर केले. लाखो मराठा बांधव मुंबईत येणार असतील, तर त्यांना कसे अडवणार, असा सवालदेखील त्यांनी यावेळी विचारला.   

मराठा आरक्षणासाठी समाजाच्या वतीने राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर २३ डिसेंबर रोजी बीड येथील पाटील मैदानावर निर्णायक इशारा सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. शांततेचे ब्रह्मास्त्र सर्वांत मोठे आहे. स्वत:च्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात शांततेत सहभागी व्हा. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटायचे नाही, असे जरांगे म्हणाले. 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, सारथी, महामंडळाला बजेट द्या; तरच तुमचं आमचं जमणार, असे जरांगे यांनी राज्य सरकारला सभेतून सूचित केले. 

मुंबईला जाण्याची हौस नाही...

आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. जनभावना लक्षात घ्या. ३ महिने, ४० दिवस; नंतर दोन महिने व नंतर २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला. आम्ही सहन तरी किती दिवस करायचे? असा सवाल जरांगे यांनी केला. आंतरवालीपासून मुंबईपर्यंत मराठा समाज मला भेटायला मुंबईत येणार. तीन कोटींपेक्षा जास्त समाज मला भेटायला येणार. खाण्याची व पांघरायची व्यवस्था आम्ही आमची करू; फक्त प्रसाधनगृहांची सोय तेवढी करा, असे ते म्हणाले. मंत्री छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत जरांगे म्हणाले, सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्याचंच ऐकू नका; नाहीतर जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तोपर्यंत संयम राखावा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सर्वोच्च न्यायालय २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. वकिलांची फौज  सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. त्रुटी दूर केल्या जातील. राज्यात कायदा सुव्यवस्था, शांतता राहिली पाहिजे. आरक्षण मिळावे ही सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कोणीही घाईगडबडीने निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोणी आरे म्हटले तर कोणीतरी कारे करणारच आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतल्याने दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशीच आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालय अडथळा दूर करेल. - छगन भुजबळ, मंत्री.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेChhagan Bhujbalछगन भुजबळ