शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी जितकी फसवी तितकीच शिवभोजन योजनाही: राम कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 10:40 IST

बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी कदम यांनी केली.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी आणि 10 रुपयात जेवण ह्या योजनांची घोषणा केली. मात्र या दोन्ही योजना अटी-शर्तीच्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर आता याच मुद्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी सुद्धा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. मात्र 2 लाखांच्या वरती कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. तर त्याचप्रमाणे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयात जेवण देण्याची योजनेची सुद्धा सरकारने घोषणा केली आहे. पण त्यासाठी सुद्धा अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहे.

तर सरकारच्या या दोन्ही योजना फसव्या असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. 'बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच त्यांची शिवभोजन योजना सुद्धा फसवी असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. 10 रुपयात जेवणाची थाली देण्याची घोषणा केली मात्र तेथेही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. गरीबाला जेवू घालताय की त्यांची थट्टा करताय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी कदम यांनी केली.