शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकऱ्यांच्या विजेवर डल्ला

By admin | Updated: October 17, 2014 01:06 IST

सध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.

तीन तासचा कमी वीज पुरवठाकमल शर्मा - नागपूरसध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. असे असताना शहरात मात्र २४ तास प्रकाश आहे. निवडणूक काळात कुठेही विजेचा तुटवडा दिसून आला नाही. यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांच्या वाट्याची वीज शहरात वितरित करून महावितरण कंपनी स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे विदर्भातील शेतकरी विजेसाठी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या पिकांना पाणी मिळत नसल्याने, हाती आलेले उभे पीक मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महावितरण राज्यातील कृषीबहुल क्षेत्रातील फिडरवरून दिवसा आठ तास व रात्री दहा तास थ्री फेज विजेचा पुरवठा करते. याशिवाय इतर वेळी सिंगल फेज वीज दिल्या जाते.सिंगल फेजचा उपयोग काय ?ज्या फिडरवरून कृषी पंपासह गावातील कनेक्शन जुळले आहेत, अशाच ठिकाणी हा नियम लागू होतो. शिवाय ज्या फिडरवर केवळ कृषीपंपाचे कनेक्शन आहे, तेथे सिंगल फेज विजेचा पुरवठा होत नाही. कारण शेतकरी हा केवळ थ्री फेज विजेचाच उपयोग करू शकतो. राज्यातील विधानसभा निवडणुका पाहता महावितरणाची कुठेही लोडशेडिंग करण्याची इच्छा नव्हती. मात्र विजेच्या तुटवड्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते. यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांना टार्गेट करून, गत दहा दिवसापासून शेतकऱ्यांना मिळणारा वीज पुरवठा अचानक कमी केला. त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना दिवसा सात तास व रात्री आठ तास थ्री फेज वीज मिळत आहे. यावरून शेतकऱ्यांना रात्री दोन तास व दिवसा एक तास कमी वीज मिळत असल्याचे स्पष्ट होते. याचा सर्वाधिक फटका विदर्भातील धान उत्पादकांसह राज्यभरातील बागायतदार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकरी महावितरणच्या कार्यालयात पायपीट करीत आहेत. महावितरणचे अधिकारी काहीच दिवसांची ही समस्या असल्याचे सांगून त्यांना परत पाठवित आहे. मात्र शेतकरी या समस्येने तेवढाच त्रस्त झाला आहे. (प्रतिनिधी)