शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विजेवर डल्ला

By admin | Updated: October 17, 2014 01:06 IST

सध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.

तीन तासचा कमी वीज पुरवठाकमल शर्मा - नागपूरसध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. असे असताना शहरात मात्र २४ तास प्रकाश आहे. निवडणूक काळात कुठेही विजेचा तुटवडा दिसून आला नाही. यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांच्या वाट्याची वीज शहरात वितरित करून महावितरण कंपनी स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे विदर्भातील शेतकरी विजेसाठी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या पिकांना पाणी मिळत नसल्याने, हाती आलेले उभे पीक मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महावितरण राज्यातील कृषीबहुल क्षेत्रातील फिडरवरून दिवसा आठ तास व रात्री दहा तास थ्री फेज विजेचा पुरवठा करते. याशिवाय इतर वेळी सिंगल फेज वीज दिल्या जाते.सिंगल फेजचा उपयोग काय ?ज्या फिडरवरून कृषी पंपासह गावातील कनेक्शन जुळले आहेत, अशाच ठिकाणी हा नियम लागू होतो. शिवाय ज्या फिडरवर केवळ कृषीपंपाचे कनेक्शन आहे, तेथे सिंगल फेज विजेचा पुरवठा होत नाही. कारण शेतकरी हा केवळ थ्री फेज विजेचाच उपयोग करू शकतो. राज्यातील विधानसभा निवडणुका पाहता महावितरणाची कुठेही लोडशेडिंग करण्याची इच्छा नव्हती. मात्र विजेच्या तुटवड्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते. यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांना टार्गेट करून, गत दहा दिवसापासून शेतकऱ्यांना मिळणारा वीज पुरवठा अचानक कमी केला. त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना दिवसा सात तास व रात्री आठ तास थ्री फेज वीज मिळत आहे. यावरून शेतकऱ्यांना रात्री दोन तास व दिवसा एक तास कमी वीज मिळत असल्याचे स्पष्ट होते. याचा सर्वाधिक फटका विदर्भातील धान उत्पादकांसह राज्यभरातील बागायतदार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकरी महावितरणच्या कार्यालयात पायपीट करीत आहेत. महावितरणचे अधिकारी काहीच दिवसांची ही समस्या असल्याचे सांगून त्यांना परत पाठवित आहे. मात्र शेतकरी या समस्येने तेवढाच त्रस्त झाला आहे. (प्रतिनिधी)