शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
3
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
4
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
6
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
7
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
8
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
9
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
10
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
11
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
12
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
13
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
14
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
15
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
16
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
17
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
18
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
19
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
20
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

शेतकऱ्यांच्या विजेवर डल्ला

By admin | Updated: October 17, 2014 01:06 IST

सध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.

तीन तासचा कमी वीज पुरवठाकमल शर्मा - नागपूरसध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. असे असताना शहरात मात्र २४ तास प्रकाश आहे. निवडणूक काळात कुठेही विजेचा तुटवडा दिसून आला नाही. यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांच्या वाट्याची वीज शहरात वितरित करून महावितरण कंपनी स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे विदर्भातील शेतकरी विजेसाठी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या पिकांना पाणी मिळत नसल्याने, हाती आलेले उभे पीक मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महावितरण राज्यातील कृषीबहुल क्षेत्रातील फिडरवरून दिवसा आठ तास व रात्री दहा तास थ्री फेज विजेचा पुरवठा करते. याशिवाय इतर वेळी सिंगल फेज वीज दिल्या जाते.सिंगल फेजचा उपयोग काय ?ज्या फिडरवरून कृषी पंपासह गावातील कनेक्शन जुळले आहेत, अशाच ठिकाणी हा नियम लागू होतो. शिवाय ज्या फिडरवर केवळ कृषीपंपाचे कनेक्शन आहे, तेथे सिंगल फेज विजेचा पुरवठा होत नाही. कारण शेतकरी हा केवळ थ्री फेज विजेचाच उपयोग करू शकतो. राज्यातील विधानसभा निवडणुका पाहता महावितरणाची कुठेही लोडशेडिंग करण्याची इच्छा नव्हती. मात्र विजेच्या तुटवड्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते. यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांना टार्गेट करून, गत दहा दिवसापासून शेतकऱ्यांना मिळणारा वीज पुरवठा अचानक कमी केला. त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना दिवसा सात तास व रात्री आठ तास थ्री फेज वीज मिळत आहे. यावरून शेतकऱ्यांना रात्री दोन तास व दिवसा एक तास कमी वीज मिळत असल्याचे स्पष्ट होते. याचा सर्वाधिक फटका विदर्भातील धान उत्पादकांसह राज्यभरातील बागायतदार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकरी महावितरणच्या कार्यालयात पायपीट करीत आहेत. महावितरणचे अधिकारी काहीच दिवसांची ही समस्या असल्याचे सांगून त्यांना परत पाठवित आहे. मात्र शेतकरी या समस्येने तेवढाच त्रस्त झाला आहे. (प्रतिनिधी)