शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 09:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, यात शेतकऱ्यांचे मागील थकीत वीजबिल माफ केले आहे. ७.५ एचपीपर्यंतच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा मोफत केला असून, मागील वीजबिलाची थकबाकी द्यायची नाही अन् पुढील वीजबिलही भरायचे नाही, असा ‘अर्थ’पूर्ण सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला. उदगीर येथे उपमुख्यमंत्री पवार यांची जनसन्मान यात्रा झाली. 

यावेळी मंचावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी रात्रीऐवजी आता दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यापुढील अर्थसंकल्प ७ लाख कोटी रुपयांचा सादर करू, असेही ते म्हणाले.

सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार nयावेळी अजित पवार म्हणाले, महायुती सरकारने लोककल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळे राज्यात आर्थिक संकट ओढावेल, असा आरोप विरोधक करीत आहेत.nमात्र, पुढील काळात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहतील. शेतकऱ्यांच्या मोफत वीजबिलासाठी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.nमाझ्याकडे दहा वर्षांपासून अर्थ खाते असल्याने विकासकामांसाठी निधींची तरतूद कशी करावी, आर्थिक गळती थांबवून आर्थिक सुबत्ता कशी आणावी, याचा आपणास अनुभव आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना पुढे सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त  केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी