शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

हे सरकार शेतक-यांचे वाटत नाही - राजू शेट्टी

By admin | Updated: April 4, 2017 23:25 IST

राज्य सरकार शेतक-यांचे प्रश्न गांभीर्याने हाताळताना दिसत नाही. राज्यात देव देवतांचे अच्छे दिन आले आहेत. मंदिर, यात्रा, महोत्सवांसाठी पैसे मिळत आहेत.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 04 -  राज्य सरकार शेतक-यांचे प्रश्न गांभीर्याने हाताळताना दिसत नाही. राज्यात देव देवतांचे अच्छे दिन आले आहेत. मंदिर, यात्रा, महोत्सवांसाठी पैसे मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदी करू शकत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहे. उद्योगपतींना झटक्यात हजारो कोटींची कर्जमाफी केली जाते. शेतक-यांच्या कर्जमाफीला मात्र बगल दिली जाते. हे सरकार शेतक-यांचे वाटत नाही, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केली.
खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी लोकमत भवनला भेट दिली. यावेळी संपादकीय सहका-यांशी चर्चा करताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतक-यांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र सरकार मात्र या दिशेने हालचाल करतााना दिसत नाही. राज्य सरकारने निव्वळ शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांचा कर्जमाफीसाठी विचार करावा. तो आयकर भरतो तो शेतकरी नाहीच. नावावर सातबारा म्हणून शेतकरी ही व्याख्या आता बदलावी लागेल. घरी दोन एकर शेती पण मुलगा शासकीय नोकरीत, उद्योगपती पण नावावर शेती, शेती असलेले राजकीय नेते अशांना बाजुला काढून उर्वरित ख-या शेतक-यांना कर्जमाफी देण्याची गरज आहे. तसे झाले तर कर्जमाफीची रक्कमही कमी होईल, असा पर्याय शेट्टी यांनी सूचवला. 
देशातील ५ हजार उद्योगपतींनी १ लाख ७० हजार कोटींचे कर्ज बुडविले. यातील फक्त १० उद्योगपतींनी ५८ हजार कोटींचे कर्ज बुडविले. दुसरीकडे २ कोटी शेतक-यांवर ३० हजार कोटींचे कर्ज आहे. ते माफ करायला सरकार का-कू करते आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीला विरोध करणा-या अरुंधती भट्टाचार्य यांना कर्जबुडवे उद्योगपती दिसले नाहीत का, विजय मल्ल्या दिसला नाही का, असा सवालही त्यांनी केला. लवकरच शेतकरी नेत्यांना सोबत घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून केंद्र व राज्य सरकारने मिळून शेतक-यांवरील कर्ज मिटवावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
गेल्यावर्षी तुटवड्यामुळे सरकारने तुरीचा प्रचार केला. शेतक-यांनी तूर लागवड केली. भाव ११ हजार रुपये क्विंटलवरून ३ हजार ८०० रुपयांवर आले. तुरीचे उत्पादन व दरातील फरक ३ लाख ९० हजार कोटींचा आहे. हे शेतक-यांचे नुकसानच आहे. सोयाबीन तेलाचे भाव वाढत आहे. पण सोयाबीनला दर नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. शेतमालाच्या चढउताराचा फायदा घेणा-या मधल्या वर्गाकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारला २०१९ मध्ये शेतकºयांच्या दारात जायचे असेल तर शेतक-यांना मदत करावीच लागेल, असा सूचक इशाराही शेट्टी यांनी दिला. 
 
मे च्या पहिल्या आठवड्यात पुढील आंदोलनाची घोषणा
- स्वाभीमानी शेतकीर संघटनेतर्फे गेल्यावर्षी अक्षय तृतीयेपासून देभशर ‘किसान ऋणमुक्त अभियान’ राबविण्यात आले. त्याला २८ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात शेतक-यांकडे असलेल्या कर्जाची माहिची संकलित करण्यात आली. शेतक-यांकडून साडेसहा लाख अर्ज भरून घेण्यात आले आहेत. येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढली जाईल. मे च्या पहिल्या आठवड्यात पुढील आंदोलनाची  घोषणा केली जाईल, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.