शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
4
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
5
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
6
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
7
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
8
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
9
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
10
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
11
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
12
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
13
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
14
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
15
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
16
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
17
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
18
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
19
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
20
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

हे सरकार शेतक-यांचे वाटत नाही - राजू शेट्टी

By admin | Updated: April 4, 2017 23:25 IST

राज्य सरकार शेतक-यांचे प्रश्न गांभीर्याने हाताळताना दिसत नाही. राज्यात देव देवतांचे अच्छे दिन आले आहेत. मंदिर, यात्रा, महोत्सवांसाठी पैसे मिळत आहेत.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 04 -  राज्य सरकार शेतक-यांचे प्रश्न गांभीर्याने हाताळताना दिसत नाही. राज्यात देव देवतांचे अच्छे दिन आले आहेत. मंदिर, यात्रा, महोत्सवांसाठी पैसे मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदी करू शकत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहे. उद्योगपतींना झटक्यात हजारो कोटींची कर्जमाफी केली जाते. शेतक-यांच्या कर्जमाफीला मात्र बगल दिली जाते. हे सरकार शेतक-यांचे वाटत नाही, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केली.
खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी लोकमत भवनला भेट दिली. यावेळी संपादकीय सहका-यांशी चर्चा करताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतक-यांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र सरकार मात्र या दिशेने हालचाल करतााना दिसत नाही. राज्य सरकारने निव्वळ शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांचा कर्जमाफीसाठी विचार करावा. तो आयकर भरतो तो शेतकरी नाहीच. नावावर सातबारा म्हणून शेतकरी ही व्याख्या आता बदलावी लागेल. घरी दोन एकर शेती पण मुलगा शासकीय नोकरीत, उद्योगपती पण नावावर शेती, शेती असलेले राजकीय नेते अशांना बाजुला काढून उर्वरित ख-या शेतक-यांना कर्जमाफी देण्याची गरज आहे. तसे झाले तर कर्जमाफीची रक्कमही कमी होईल, असा पर्याय शेट्टी यांनी सूचवला. 
देशातील ५ हजार उद्योगपतींनी १ लाख ७० हजार कोटींचे कर्ज बुडविले. यातील फक्त १० उद्योगपतींनी ५८ हजार कोटींचे कर्ज बुडविले. दुसरीकडे २ कोटी शेतक-यांवर ३० हजार कोटींचे कर्ज आहे. ते माफ करायला सरकार का-कू करते आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीला विरोध करणा-या अरुंधती भट्टाचार्य यांना कर्जबुडवे उद्योगपती दिसले नाहीत का, विजय मल्ल्या दिसला नाही का, असा सवालही त्यांनी केला. लवकरच शेतकरी नेत्यांना सोबत घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून केंद्र व राज्य सरकारने मिळून शेतक-यांवरील कर्ज मिटवावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
गेल्यावर्षी तुटवड्यामुळे सरकारने तुरीचा प्रचार केला. शेतक-यांनी तूर लागवड केली. भाव ११ हजार रुपये क्विंटलवरून ३ हजार ८०० रुपयांवर आले. तुरीचे उत्पादन व दरातील फरक ३ लाख ९० हजार कोटींचा आहे. हे शेतक-यांचे नुकसानच आहे. सोयाबीन तेलाचे भाव वाढत आहे. पण सोयाबीनला दर नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. शेतमालाच्या चढउताराचा फायदा घेणा-या मधल्या वर्गाकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारला २०१९ मध्ये शेतकºयांच्या दारात जायचे असेल तर शेतक-यांना मदत करावीच लागेल, असा सूचक इशाराही शेट्टी यांनी दिला. 
 
मे च्या पहिल्या आठवड्यात पुढील आंदोलनाची घोषणा
- स्वाभीमानी शेतकीर संघटनेतर्फे गेल्यावर्षी अक्षय तृतीयेपासून देभशर ‘किसान ऋणमुक्त अभियान’ राबविण्यात आले. त्याला २८ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात शेतक-यांकडे असलेल्या कर्जाची माहिची संकलित करण्यात आली. शेतक-यांकडून साडेसहा लाख अर्ज भरून घेण्यात आले आहेत. येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढली जाईल. मे च्या पहिल्या आठवड्यात पुढील आंदोलनाची  घोषणा केली जाईल, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.