शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शेतकऱ्यांनो...१५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका! महाराष्ट्र चिंतेत, पाणीसाठा घटतोय वेगाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 10:52 IST

पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे.

विशाल सोनटक्के  यवतमाळ :पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे.  ऐन पावसाळ्यात राज्यातील ५९१ गावे आणि १३१२ वाड्यांची ५०१ टँकरद्वारे तहान भागविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार खरिपासाठी यंदा राज्यात १४६.८५ लाख हेक्टरवर खरीप पेरणी अपेक्षित आहे. पाऊस आणखी लांबणीवर पडल्यास हे नियोजन बिघडेल. त्यामुळे १५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.

तारीख - १४ जूनपर्यंत.- अपेक्षित पाऊस - सरासरी ९६.०९ मिमी- झाला किती - सरासरी ३४.०९ मिमी- म्हणजेच - अपेक्षित सरासरीच्या ३६ टक्के- गेल्या वर्षी १४ जूनपर्यंत - १२४ टक्के

कोणत्या विभागात किती पाऊस? (१४ जूनपर्यंत)कोकण - २४.०३ टक्केनाशिक - ५०.०५ टक्केपुणे - ३७.०८ टक्केऔरंगाबाद - ६९.०४ टक्केअमरावती - ३२.०४ टक्केनागपूर - ११.०९ टक्के

पाणीटंचाईच्या झळा५९१ गावे ।  १३१२ वाड्या५०१ टँकर  । गेल्या वर्षी - ४८७ टँकर 

पाणीटंचाईचा प्रश्न गंभीरएकूण प्रकल्प- ३,२६७उपलब्ध साठा - २३.१६%(१४ जून रोजी)

खरीप हंगामाची प्रशासन स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, पाऊस लांबणीवर पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ तारखेनंतरच पावसाचा अंदाज असल्याने २२ जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करूच नये. जुलै महिन्यात ६ तारखेनंतर पुन्हा पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत पेरण्या केल्या जाऊ शकतात. - शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

विभाग - टँकर- नाशिक - ११९- कोकण - ११५- पुणे - ७९- औरंगाबाद - ९४- अमरावती - ८७- नागपूर - ७

सर्वात कमी विदर्भात राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १४ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ३२.०४ टक्के तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सरासरीच्या ११.०९ टक्के पाऊस झाला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस