शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही - अजित पवार

By admin | Updated: April 12, 2017 01:23 IST

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे. केवळ नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे.

बारामती (जि. पुणे) : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे. केवळ नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यांच्यासाठी कर्जमाफी मागितली, त्यावर निर्णय घेत नाहीत. शिल्लक पाण्याचे नियोजन होत नाही. सरकारला शेतकऱ्यांची आस्थाच नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी मंगळवारी केली. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसभापतींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘आम्ही सत्तेत असताना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचे नियोजन करत होतो. आता नियोजनअभावी धरणे कोरडी पडत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.’ हे या सरकारला कळत नाही, असे पवार म्हणाले. केंद्र व राज्य सरकारने विजेचे दर वाढविले. अगोदर शेतकरी पिचला आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष यात्रेद्वारे कर्जमाफी द्या, अशी मागणी करीत आहोत. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार. कर्जमाफी केल्यावर आत्महत्या होणार नाहीत, याची हमी कोण देणार? दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीची हमी, मुख्यमंत्री देणार का, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)कच्ची साखर आयात कशासाठी!सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज काढून एफआरपी दिली. देशात २८० मेट्रिक टन साखर उत्पादन झाले. तरीदेखील देशांतर्गत साखरेचे दर पाडण्यासाठी ५ लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात केली. सरकार शेतकरीविरोधी आहे. उद्योगपतींना फायदा करण्यासाठी हा प्रकार केला, असा आरोप अजित पवार यांनी केला.