शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही - अजित पवार

By admin | Updated: April 12, 2017 01:23 IST

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे. केवळ नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे.

बारामती (जि. पुणे) : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे. केवळ नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यांच्यासाठी कर्जमाफी मागितली, त्यावर निर्णय घेत नाहीत. शिल्लक पाण्याचे नियोजन होत नाही. सरकारला शेतकऱ्यांची आस्थाच नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी मंगळवारी केली. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसभापतींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘आम्ही सत्तेत असताना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचे नियोजन करत होतो. आता नियोजनअभावी धरणे कोरडी पडत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.’ हे या सरकारला कळत नाही, असे पवार म्हणाले. केंद्र व राज्य सरकारने विजेचे दर वाढविले. अगोदर शेतकरी पिचला आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष यात्रेद्वारे कर्जमाफी द्या, अशी मागणी करीत आहोत. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार. कर्जमाफी केल्यावर आत्महत्या होणार नाहीत, याची हमी कोण देणार? दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीची हमी, मुख्यमंत्री देणार का, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)कच्ची साखर आयात कशासाठी!सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज काढून एफआरपी दिली. देशात २८० मेट्रिक टन साखर उत्पादन झाले. तरीदेखील देशांतर्गत साखरेचे दर पाडण्यासाठी ५ लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात केली. सरकार शेतकरीविरोधी आहे. उद्योगपतींना फायदा करण्यासाठी हा प्रकार केला, असा आरोप अजित पवार यांनी केला.