शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही - अजित पवार

By admin | Updated: April 12, 2017 01:23 IST

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे. केवळ नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे.

बारामती (जि. पुणे) : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे. केवळ नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यांच्यासाठी कर्जमाफी मागितली, त्यावर निर्णय घेत नाहीत. शिल्लक पाण्याचे नियोजन होत नाही. सरकारला शेतकऱ्यांची आस्थाच नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी मंगळवारी केली. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसभापतींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘आम्ही सत्तेत असताना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचे नियोजन करत होतो. आता नियोजनअभावी धरणे कोरडी पडत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.’ हे या सरकारला कळत नाही, असे पवार म्हणाले. केंद्र व राज्य सरकारने विजेचे दर वाढविले. अगोदर शेतकरी पिचला आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष यात्रेद्वारे कर्जमाफी द्या, अशी मागणी करीत आहोत. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार. कर्जमाफी केल्यावर आत्महत्या होणार नाहीत, याची हमी कोण देणार? दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीची हमी, मुख्यमंत्री देणार का, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)कच्ची साखर आयात कशासाठी!सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज काढून एफआरपी दिली. देशात २८० मेट्रिक टन साखर उत्पादन झाले. तरीदेखील देशांतर्गत साखरेचे दर पाडण्यासाठी ५ लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात केली. सरकार शेतकरीविरोधी आहे. उद्योगपतींना फायदा करण्यासाठी हा प्रकार केला, असा आरोप अजित पवार यांनी केला.