शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:20 IST

विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने तालुक्यातील पिके वाया गेली, शेतात गुडघाभर पाणी साचले, घरे पडली. शेतकरी हतबल झाले असून मदतीसाठी कोणी तरी येईल, अशी चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकऱ्यांचे डोळे रस्त्याकडे लागले असतानाच गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, सिल्लोड मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे सतार यांचे पालकमंत्री व आमदार सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी राज्यभर दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे प्रयत्न करत आहे. रविवारी सिल्लोडच्या गेवराई सेमी येथे एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.

मात्र मंत्र्यांचा ताफा येताच गेवराई सेमी येथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडले. साहेब आम्ही बरबाद झालो...पिके वाया गेली... घरे पडली... अतिवृष्टीने होते नव्हते ते सारे हिरावून घेतले. आता तुम्हीच आमचे मायबाप... काहीही करा: पण आम्हाला या संकटातुन सावरा अशी विनवणी शेतकरी करीत होते. ही विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. धीर धरा, घाबरू नका. आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. नुकसानभरपाईसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गरज पडली तर सरकारला पैशाची तरतूद करण्यास भाग पाडू. नुकसानभरपाईचे फोटो तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करा. प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ