शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:20 IST

विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने तालुक्यातील पिके वाया गेली, शेतात गुडघाभर पाणी साचले, घरे पडली. शेतकरी हतबल झाले असून मदतीसाठी कोणी तरी येईल, अशी चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकऱ्यांचे डोळे रस्त्याकडे लागले असतानाच गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, सिल्लोड मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे सतार यांचे पालकमंत्री व आमदार सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी राज्यभर दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे प्रयत्न करत आहे. रविवारी सिल्लोडच्या गेवराई सेमी येथे एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.

मात्र मंत्र्यांचा ताफा येताच गेवराई सेमी येथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडले. साहेब आम्ही बरबाद झालो...पिके वाया गेली... घरे पडली... अतिवृष्टीने होते नव्हते ते सारे हिरावून घेतले. आता तुम्हीच आमचे मायबाप... काहीही करा: पण आम्हाला या संकटातुन सावरा अशी विनवणी शेतकरी करीत होते. ही विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. धीर धरा, घाबरू नका. आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. नुकसानभरपाईसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गरज पडली तर सरकारला पैशाची तरतूद करण्यास भाग पाडू. नुकसानभरपाईचे फोटो तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करा. प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ