शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:20 IST

विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने तालुक्यातील पिके वाया गेली, शेतात गुडघाभर पाणी साचले, घरे पडली. शेतकरी हतबल झाले असून मदतीसाठी कोणी तरी येईल, अशी चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकऱ्यांचे डोळे रस्त्याकडे लागले असतानाच गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, सिल्लोड मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे सतार यांचे पालकमंत्री व आमदार सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी राज्यभर दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे प्रयत्न करत आहे. रविवारी सिल्लोडच्या गेवराई सेमी येथे एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.

मात्र मंत्र्यांचा ताफा येताच गेवराई सेमी येथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडले. साहेब आम्ही बरबाद झालो...पिके वाया गेली... घरे पडली... अतिवृष्टीने होते नव्हते ते सारे हिरावून घेतले. आता तुम्हीच आमचे मायबाप... काहीही करा: पण आम्हाला या संकटातुन सावरा अशी विनवणी शेतकरी करीत होते. ही विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. धीर धरा, घाबरू नका. आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. नुकसानभरपाईसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गरज पडली तर सरकारला पैशाची तरतूद करण्यास भाग पाडू. नुकसानभरपाईचे फोटो तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करा. प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ