शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:22 IST

एकीकडे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहेत तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे असा आरोप शेट्टी यांनी केला.

कोल्हापूर - राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषी पंपाना जलमापक यंत्र (पाणी मीटर) बसविले जाणार आहेत हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना पंचगंगा आणि कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला .

शिरोली येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने जुलमी वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे बेंगलोर महामार्ग रास्ता रोको आंदोलन छेडले होते. यावेळी त्यांनी इशारा दिला. आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभिजित मेहत्रे यांनी जलसंपदा विभागाचे पत्र घेऊन सरकारने याबाबत ६ जून रोजी बैठकीचे लेखी आश्वासन दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.

यावेळी शेट्टी म्हणाले दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतक-यांना ऊस बिले अदा करत आहेत याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले आम्हाला आंदोलन करु नका असे मंत्रालयातून दबाव आणला गेला. मुंबई पासून फोन येत होता. आज हजारो शेतकरी‌ कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून आले आहेत. उन्हात रस्त्यावर आंदोलनात सहभागी झाले आहेत. ज्यांना शेती माहिती नाही अशांची आज सत्ता आहे, ज्यांना शेती माहिती नाही असे आधीकारी आणून बसवले आहेत आणि शेतकऱ्यांना छळण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले काल मंत्रालय स्तरावर चर्चा झाली. ६ जून रोजी मंत्रालयात बैठक घेऊन सन्मानजन्य‌ तोडगा काढू असे पत्र आले आहे. एका बाजूला शासनाच्या योजनांच ८१ टक्के बिल शासन भरत. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था आहेत तिथे दरवाढ करायची हे अन्याय कारक आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर म्हणाले शेतीला हेक्टरी १३०० ऐवजी १३००० रुपये पाणीपट्टी आकारली आहे. पाणी पट्टी भरलीनाही तर पाणी नाही हा कुठला कायदा काढला. शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहात. शेतकऱ्यांला डिवचले तर तुम्हाला महागात पडेल.

यावेळी माजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी बाबासाहेब देवकर, जे. पी. लाड,भारत पाटील-भुयेकर, शशिकांत खवरे, एस.एम. क्षीरसागर, देवराज पाटील, प्रदिपराव पाटील,चंद्रकांत पाटील-पाडळीकर, महादेव सुतार, विश्वास पवार व सचिव मारुती पाटील, यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. चौकट : मिटर बसवण्याचा घाट कशाला... महाराष्ट्र शासनाला मिटर बसवणारा ठेकेदार भेटला असेल त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या माथी मिटर बसवण्याचा घाट घातला असेल असे आमदार सतेज पाटील म्हणाले. ६ जून रोजी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्या सोबत बैठक होणार असून त्यात ही जाचक पाणी पट्टी दरवाढ मागे घेतली नाही तर पुन्हा तिव्र आंदोलन छेडणार. असे विक्रांत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी