शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:22 IST

एकीकडे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहेत तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे असा आरोप शेट्टी यांनी केला.

कोल्हापूर - राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषी पंपाना जलमापक यंत्र (पाणी मीटर) बसविले जाणार आहेत हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना पंचगंगा आणि कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला .

शिरोली येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने जुलमी वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे बेंगलोर महामार्ग रास्ता रोको आंदोलन छेडले होते. यावेळी त्यांनी इशारा दिला. आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभिजित मेहत्रे यांनी जलसंपदा विभागाचे पत्र घेऊन सरकारने याबाबत ६ जून रोजी बैठकीचे लेखी आश्वासन दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.

यावेळी शेट्टी म्हणाले दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतक-यांना ऊस बिले अदा करत आहेत याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले आम्हाला आंदोलन करु नका असे मंत्रालयातून दबाव आणला गेला. मुंबई पासून फोन येत होता. आज हजारो शेतकरी‌ कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून आले आहेत. उन्हात रस्त्यावर आंदोलनात सहभागी झाले आहेत. ज्यांना शेती माहिती नाही अशांची आज सत्ता आहे, ज्यांना शेती माहिती नाही असे आधीकारी आणून बसवले आहेत आणि शेतकऱ्यांना छळण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले काल मंत्रालय स्तरावर चर्चा झाली. ६ जून रोजी मंत्रालयात बैठक घेऊन सन्मानजन्य‌ तोडगा काढू असे पत्र आले आहे. एका बाजूला शासनाच्या योजनांच ८१ टक्के बिल शासन भरत. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था आहेत तिथे दरवाढ करायची हे अन्याय कारक आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर म्हणाले शेतीला हेक्टरी १३०० ऐवजी १३००० रुपये पाणीपट्टी आकारली आहे. पाणी पट्टी भरलीनाही तर पाणी नाही हा कुठला कायदा काढला. शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहात. शेतकऱ्यांला डिवचले तर तुम्हाला महागात पडेल.

यावेळी माजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी बाबासाहेब देवकर, जे. पी. लाड,भारत पाटील-भुयेकर, शशिकांत खवरे, एस.एम. क्षीरसागर, देवराज पाटील, प्रदिपराव पाटील,चंद्रकांत पाटील-पाडळीकर, महादेव सुतार, विश्वास पवार व सचिव मारुती पाटील, यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. चौकट : मिटर बसवण्याचा घाट कशाला... महाराष्ट्र शासनाला मिटर बसवणारा ठेकेदार भेटला असेल त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या माथी मिटर बसवण्याचा घाट घातला असेल असे आमदार सतेज पाटील म्हणाले. ६ जून रोजी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्या सोबत बैठक होणार असून त्यात ही जाचक पाणी पट्टी दरवाढ मागे घेतली नाही तर पुन्हा तिव्र आंदोलन छेडणार. असे विक्रांत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी