शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वसंतदादा कारखान्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: July 26, 2016 00:55 IST

वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला

सांगली : वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला. खिडक्यांच्या काचा फोडून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. कारखान्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिवसभर ठिय्या मारला. पुढील सोमवारच्या तारखेचा धनादेश कारखाना प्रशासनाने दिल्याने आंदोलन शांत झाले. वसंतदादा कारखान्याच्या थकीत ऊसबिलाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. कार्यक्षेत्रातील शेतकरी आक्रमक होऊ लागल्यानंतर कारखाना प्रशासनाने त्यांना धनादेश दिले होते. परंतु ते न वठल्याने संतप्त झालेल्या शेतकरी कारखान्यावर एकत्र आले. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहींनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्याचवेळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कारखाना प्रशासनाचा धिक्कार करीत जोरदार निदर्शने करण्यात आली. बिले मिळाल्याशिवाय कारखान्यावरून जाणार नाही, अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली. शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयाला गराडा घातल्याने प्रशासनाची कोंडी झाली. थकीत बिलाच्या प्रश्नावर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पाटील यांनी पुढील आठवड्याचा धनादेश देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार कारखान्याचे मुख्य लेखापाल व्ही. एस. सरनोबत यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. १ आॅगस्टचे धनादेश लिहून दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. (प्रतिनिधी)शेतकरी संतप्तकारखाना कार्यस्थळावर सुमारे सव्वाशे शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या मांडला होता. शेतकरी संतप्त झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला होता. थकबाकीबाबत गोंधळ कारखान्याची २0१३-१४, २0१४-१५ या हंगामातील नेमकी किती थकबाकी आहे, याबाबत संभ्रमावस्था आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनुसार, सुमारे १३ कोटींची थकबाकी आहे, तर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, २५ कोटी आहे.