शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

वसंतदादा कारखान्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: July 26, 2016 00:55 IST

वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला

सांगली : वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला. खिडक्यांच्या काचा फोडून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. कारखान्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिवसभर ठिय्या मारला. पुढील सोमवारच्या तारखेचा धनादेश कारखाना प्रशासनाने दिल्याने आंदोलन शांत झाले. वसंतदादा कारखान्याच्या थकीत ऊसबिलाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. कार्यक्षेत्रातील शेतकरी आक्रमक होऊ लागल्यानंतर कारखाना प्रशासनाने त्यांना धनादेश दिले होते. परंतु ते न वठल्याने संतप्त झालेल्या शेतकरी कारखान्यावर एकत्र आले. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहींनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्याचवेळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कारखाना प्रशासनाचा धिक्कार करीत जोरदार निदर्शने करण्यात आली. बिले मिळाल्याशिवाय कारखान्यावरून जाणार नाही, अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली. शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयाला गराडा घातल्याने प्रशासनाची कोंडी झाली. थकीत बिलाच्या प्रश्नावर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पाटील यांनी पुढील आठवड्याचा धनादेश देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार कारखान्याचे मुख्य लेखापाल व्ही. एस. सरनोबत यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. १ आॅगस्टचे धनादेश लिहून दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. (प्रतिनिधी)शेतकरी संतप्तकारखाना कार्यस्थळावर सुमारे सव्वाशे शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या मांडला होता. शेतकरी संतप्त झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला होता. थकबाकीबाबत गोंधळ कारखान्याची २0१३-१४, २0१४-१५ या हंगामातील नेमकी किती थकबाकी आहे, याबाबत संभ्रमावस्था आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनुसार, सुमारे १३ कोटींची थकबाकी आहे, तर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, २५ कोटी आहे.