शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

“...अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाच्या वणव्याला सामोरे जावे लागणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 10:45 IST

दुसऱ्यांनी वीज वापरायची आणि बिले आम्ही भरायची, याचा जाब विचारायला शिका, असेही ते यावेळी म्हणाले.

उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफी ही फसवी असून, शेतकऱ्यांची भावनेशी का खेळता, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजु शेट्टी यांनी तुळजापुरात केला. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाच्या वणव्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, विधानसभा निवडणूक प्रचार काळामध्ये सत्तेमध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारेमाप घोषणा केल्या. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करणार असे म्हटले. शरद पवारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, काँग्रेसच्या नेत्यांनीही अशीच घोषणा केली. भाजपा सारख्या भामट्या पक्षाला सत्तेवर येऊ द्यायचं नाही म्हणून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, नागपूर अधिवेशनामध्ये जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नसल्याचे शेट्टी म्हणाले.

ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफीमध्ये १० ते १५ टक्के शेतकरी त्यामध्ये सापडले नाहीत. राज्यातील सर्वाधिक दुष्काळी जिल्ह्यामध्ये अशी अवस्था असेल तर कर्जमाफी कोणाला? ही नुसती गंडवागंडवी झाली. गेली दोन वर्षे दुष्काळात गेली. तर विहिरीत पाणी नाही आणि वीज बिल भलेमोठे आले कसे, दुसऱ्यांनी वीज वापरायची आणि बिले आम्ही भरायची, याचा जाब विचारायला शिका, असेही ते यावेळी म्हणाले.