शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

“...अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाच्या वणव्याला सामोरे जावे लागणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 10:45 IST

दुसऱ्यांनी वीज वापरायची आणि बिले आम्ही भरायची, याचा जाब विचारायला शिका, असेही ते यावेळी म्हणाले.

उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफी ही फसवी असून, शेतकऱ्यांची भावनेशी का खेळता, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजु शेट्टी यांनी तुळजापुरात केला. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाच्या वणव्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, विधानसभा निवडणूक प्रचार काळामध्ये सत्तेमध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारेमाप घोषणा केल्या. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करणार असे म्हटले. शरद पवारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, काँग्रेसच्या नेत्यांनीही अशीच घोषणा केली. भाजपा सारख्या भामट्या पक्षाला सत्तेवर येऊ द्यायचं नाही म्हणून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, नागपूर अधिवेशनामध्ये जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नसल्याचे शेट्टी म्हणाले.

ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफीमध्ये १० ते १५ टक्के शेतकरी त्यामध्ये सापडले नाहीत. राज्यातील सर्वाधिक दुष्काळी जिल्ह्यामध्ये अशी अवस्था असेल तर कर्जमाफी कोणाला? ही नुसती गंडवागंडवी झाली. गेली दोन वर्षे दुष्काळात गेली. तर विहिरीत पाणी नाही आणि वीज बिल भलेमोठे आले कसे, दुसऱ्यांनी वीज वापरायची आणि बिले आम्ही भरायची, याचा जाब विचारायला शिका, असेही ते यावेळी म्हणाले.