शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

"बाप राबतो म्हणून अन्न मिळतं; काही वाचाळवीर त्याचीच चेष्टा करताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 07:52 IST

शेतकरी नेते अजित नवले यांचं पंतप्रधान मोदींवर जोरदार शरसंधान

नाशिक: फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरील वाचाळवीर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचं सांगत आहेत. पण मग त्यांना दिल्लीत सुरू असलेले आंदोलन दिसत नाही का, असा सवाल शेतकरी नेते अजित नवले यांनी उपस्थित केला. वर खोटारडा माणूस बसला आहे, हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं, अशा शब्दांत नवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. ते काल शिरपूरमध्ये झालेल्या किसान सभेच्या मोर्चात बोलत होते.नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत नवलेंनी सोशल मीडियावर कायद्यांची भलामण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं. 'बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याच बापाची चेष्टा करत आहात. ज्यांना बटाटा कुठे येतो माहिती नाही, ते आम्हाला शेतीचं अर्थकारण सांगत आहेत,' असा खोचक टोला नवले यांनी लगावला.नवले यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवरचा जोरदार समाचार घेतला. आमचा माल कुठे विकायचा हे आम्ही पाहू. तुम्ही हे सांगणारे कोण? कृषी कायद्यानुसार एखादा करार झाल्यानंतर व्यापाऱ्याने पैसे बुडवले तर शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. ज्याचं डोकं स्वत:च्या खांद्यावर आहे, त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, असं नवले म्हणाले.पंतप्रधान मोदींवरही निशाणावर खोटारडा माणूस बसला आहे हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं. आपण शेतात काय लावलं पाहिजे ते मूठभर लोक सांगणार. कडाक्याच्या थंडीत शेतकरी दिल्लीत बसला आहे. दिल्लीतीत शेतकऱ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही, असं अजित नवले यांनी म्हटलं.'मोदींच्या कार्यकाळात फक्त पाच टक्के लोकांचा विकास'देशातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी आहेत. या देशात फक्त पाच टक्के लोकांचा विकास होत आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत. सर्वठिकाणी कंत्राटी पद्धत आली आहे. शेतकरी संकटात आला तर संपूर्ण समाज संकटात येईल, असा इशारा किसान सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी