शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

"बाप राबतो म्हणून अन्न मिळतं; काही वाचाळवीर त्याचीच चेष्टा करताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 07:52 IST

शेतकरी नेते अजित नवले यांचं पंतप्रधान मोदींवर जोरदार शरसंधान

नाशिक: फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरील वाचाळवीर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचं सांगत आहेत. पण मग त्यांना दिल्लीत सुरू असलेले आंदोलन दिसत नाही का, असा सवाल शेतकरी नेते अजित नवले यांनी उपस्थित केला. वर खोटारडा माणूस बसला आहे, हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं, अशा शब्दांत नवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. ते काल शिरपूरमध्ये झालेल्या किसान सभेच्या मोर्चात बोलत होते.नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत नवलेंनी सोशल मीडियावर कायद्यांची भलामण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं. 'बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याच बापाची चेष्टा करत आहात. ज्यांना बटाटा कुठे येतो माहिती नाही, ते आम्हाला शेतीचं अर्थकारण सांगत आहेत,' असा खोचक टोला नवले यांनी लगावला.नवले यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवरचा जोरदार समाचार घेतला. आमचा माल कुठे विकायचा हे आम्ही पाहू. तुम्ही हे सांगणारे कोण? कृषी कायद्यानुसार एखादा करार झाल्यानंतर व्यापाऱ्याने पैसे बुडवले तर शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. ज्याचं डोकं स्वत:च्या खांद्यावर आहे, त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, असं नवले म्हणाले.पंतप्रधान मोदींवरही निशाणावर खोटारडा माणूस बसला आहे हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं. आपण शेतात काय लावलं पाहिजे ते मूठभर लोक सांगणार. कडाक्याच्या थंडीत शेतकरी दिल्लीत बसला आहे. दिल्लीतीत शेतकऱ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही, असं अजित नवले यांनी म्हटलं.'मोदींच्या कार्यकाळात फक्त पाच टक्के लोकांचा विकास'देशातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी आहेत. या देशात फक्त पाच टक्के लोकांचा विकास होत आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत. सर्वठिकाणी कंत्राटी पद्धत आली आहे. शेतकरी संकटात आला तर संपूर्ण समाज संकटात येईल, असा इशारा किसान सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी