शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दोन्ही सरकारची कर्जमाफी फसवी; संग्रामपूरच्या शेतकऱ्याने होर्डींग’उभारून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 18:15 IST

Farmer Protest through Hording in Buldhana District दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.

संग्रामपूर :  राजकीय नेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने राज्यकर्त्यांवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. त्याचे उदाहरण संग्रामपूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील भिलखेड येथील अत्यल्प भूधारक शेतकरी दोन्ही कर्जमाफीतून वंचित असल्याने  आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे डिजिटल बोर्डावर शेतात फोटो लाऊन निषेध केला आहे. दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते शेतकरी विरोधीच असल्याचा संदेश त्यातून दिला जात आहे. निळकंठ लिप्ते यांच्याकडे भिलखेड शिवारातील गट क्र. ३० मध्ये अडीच एकर शेती आहे. या एका हेक्टर शेतीवर सन २०११ साली ठिबक सिंचन संचाकरिता ४२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याच वर्षात २८ हजार रुपये पीक कर्ज काढले.  सन २०११ पासून २०१५ पर्यंत ठिबक संचासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले. मात्र नापिकीमुळे २०१५ ला हे कर्ज थकीत झाले. तसेच पूर्वी २८ हजाराच्या पीक कर्जावर शासनाच्या योजनेप्रमाणे दोन वेळा प्रत्येकी ३० हजाराचे पुनर्गठन केले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्यासाठी २४ जून २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. निकष जाहीर झाले. त्यानुसार दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. याहून अधिकची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या आवाहनानुसार अल्पभूधारक  शेतकऱ्याने कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज  केला. या शेतकऱ्यावर दोन्ही कर्जाची व्याजासह एकूण रक्कम १ लाख ४७ रूपये थकीत होती. शासनाच्या ग्रीन लिस्टमध्ये या शेतकऱ्याचे नाव आले. मात्र, केवळ ४७ हजार रुपयांचीच कर्जमाफी प्राप्त झाली. दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असल्यावर सुद्धा तत्कालीन सरकारच्या कर्जमाफीचा लाभ पूर्णपणे या शेतकऱ्याला मिळाला नाही. कालांतराने सत्ता बदल होऊन महाविकास आघाडी सत्तेत विराजमान झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीची धोषणा केली. १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले. मात्र यावेळीही या शेतकऱ्याला पूर्णपणे लाभ मिळाला नाही. १ लाख रुपये कर्ज थकीत असताना त्या शेतकऱ्याला केवळ  २८ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यांच्याकडे व्याजासह ७८ हजार रुपये बँकेचे कर्ज थकीत आहे. दोन्हीही कर्जमाफी मध्ये शासनाच्या घोषणेप्रमाणे पात्र असतानासुद्धा या शेतकऱ्याला अर्धवट कर्जमाफी देऊन थट्टा करण्यात आली. त्यामुळे हतबल  झालेल्या शेतकऱ्याने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे