शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

दोन्ही सरकारची कर्जमाफी फसवी; संग्रामपूरच्या शेतकऱ्याने होर्डींग’उभारून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 18:15 IST

Farmer Protest through Hording in Buldhana District दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.

संग्रामपूर :  राजकीय नेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने राज्यकर्त्यांवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. त्याचे उदाहरण संग्रामपूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील भिलखेड येथील अत्यल्प भूधारक शेतकरी दोन्ही कर्जमाफीतून वंचित असल्याने  आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे डिजिटल बोर्डावर शेतात फोटो लाऊन निषेध केला आहे. दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते शेतकरी विरोधीच असल्याचा संदेश त्यातून दिला जात आहे. निळकंठ लिप्ते यांच्याकडे भिलखेड शिवारातील गट क्र. ३० मध्ये अडीच एकर शेती आहे. या एका हेक्टर शेतीवर सन २०११ साली ठिबक सिंचन संचाकरिता ४२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याच वर्षात २८ हजार रुपये पीक कर्ज काढले.  सन २०११ पासून २०१५ पर्यंत ठिबक संचासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले. मात्र नापिकीमुळे २०१५ ला हे कर्ज थकीत झाले. तसेच पूर्वी २८ हजाराच्या पीक कर्जावर शासनाच्या योजनेप्रमाणे दोन वेळा प्रत्येकी ३० हजाराचे पुनर्गठन केले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्यासाठी २४ जून २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. निकष जाहीर झाले. त्यानुसार दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. याहून अधिकची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या आवाहनानुसार अल्पभूधारक  शेतकऱ्याने कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज  केला. या शेतकऱ्यावर दोन्ही कर्जाची व्याजासह एकूण रक्कम १ लाख ४७ रूपये थकीत होती. शासनाच्या ग्रीन लिस्टमध्ये या शेतकऱ्याचे नाव आले. मात्र, केवळ ४७ हजार रुपयांचीच कर्जमाफी प्राप्त झाली. दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असल्यावर सुद्धा तत्कालीन सरकारच्या कर्जमाफीचा लाभ पूर्णपणे या शेतकऱ्याला मिळाला नाही. कालांतराने सत्ता बदल होऊन महाविकास आघाडी सत्तेत विराजमान झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीची धोषणा केली. १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले. मात्र यावेळीही या शेतकऱ्याला पूर्णपणे लाभ मिळाला नाही. १ लाख रुपये कर्ज थकीत असताना त्या शेतकऱ्याला केवळ  २८ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यांच्याकडे व्याजासह ७८ हजार रुपये बँकेचे कर्ज थकीत आहे. दोन्हीही कर्जमाफी मध्ये शासनाच्या घोषणेप्रमाणे पात्र असतानासुद्धा या शेतकऱ्याला अर्धवट कर्जमाफी देऊन थट्टा करण्यात आली. त्यामुळे हतबल  झालेल्या शेतकऱ्याने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे