शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित पावसामुळे खरिपाला फटका; सर्वाधिक नुकसान मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 06:28 IST

धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असला तरी पठारी भागात अनियमित व कमी पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने, खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे : धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असला तरी पठारी भागात अनियमित व कमी पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने, खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. सर्वाधिक फटका, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. १४ जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे.राज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २४ आॅगस्ट या काळातील खरिपाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, ऊस वगळून १३४.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर (९६ टक्के) खरीप पिकांची पेरणी झाली. नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सातारा, सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने किडीचा प्रादुर्भाव झाला. अनियमित व कमी पावसामुळे उडीद, मूग व कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.नांदेड, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी व पुरामुळे कापूस, सोयाबीन, भात, मूग, तूर, ज्वारी बाजरीचे मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात २४ हजार ५८४ हेक्टर, चंद्रपूरमध्ये ११ हजार १६१ हेक्टर, नांदेडमध्ये ७१ हजार ३४९, जळगावमध्ये २५४ हेक्टर, गडचिरोलीमध्ये ९ हजार ६४२ हेक्टर, नंदुरबारमध्ये ६१५ तर धुळे जिल्ह्यात ८५८ हेक्टर अशा एकूण १ लाख १८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भात पिकावर खोडकिडा, तुडतुडे, निळे भुंगेरे, गादमाशी, पिवळ्या खोडकिडी व लष्करी अळीचा तर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.ज्वारीच्या पेरणीत २३ टक्के, बाजरी- २१ टक्के, नाचणी व मका प्रत्येकी ११ टक्के, उडीद २४ टक्के आणि मुगाच्या क्षेत्रात १२ टक्यांनी घट झाली. सूर्यफुलाच्या क्षेत्रात ५२ टक्के, कारळे ३० टक्के घट आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे नेमके किती क्षेत्र बाधित झाले आहे, हे पंचनामे केल्यानंतरच स्पष्ट होईल. उत्पादन नेमके किती घटले, हे काढणीनंतर स्पष्ट होईल, असे कृषी विस्तार संचालक विजय घावटे यांनी सांगितले.२० हजार गावांत कापसाची पेरणीच नाहीराज्यात कापूस पिकाखाली २६ जिल्हे असून एकूण २० हजार १६० गावामध्ये पेरणीच झालेली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कापसाचे उत्पादनच धोक्यात असल्याचे दिसून आले.तालुकावार पावसाची स्थितीविभाग ५०-७५% ७५-१००% १००% +कोकण ३ (तालुके) १० ३४नाशिक १५ १२ १२पुणे १६ ११ १२कोल्हापूर ८ १२ १३औरंगाबाद ११ १४ ३लातूर ७ २२ १९अमरावती ८ २५ २३नागपूर १० ३५ १९

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी