शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्न मुहूर्ताचा दुष्काळ; पण सुट्ट्यांचा सुकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 07:49 IST

मे महिन्यात मतदारांना मतदानाला येण्यास प्रोत्साहित करणे हे उमेदवारांसमोरील मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावेळी लग्न मुहूर्तांचा दुष्काळ असणार आहे. यात २ मे ते १२ जूनपर्यंत लग्नाचे कोणतेच मुहूर्त नाहीत. मात्र, मुलांच्या शाळांना लागलेल्या सुट्ट्यांचा सुकाळ आहे. त्यामुळे मतदारराजा घरात सापडेल का, हा खरा प्रश्न आहे. मे महिन्यात मतदारांना मतदानाला येण्यास प्रोत्साहित करणे हे उमेदवारांसमोरील मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात ७ मे, चौथ्या टप्प्यात १३ मे आणि पाचव्या टप्प्यासाठी २० मे अशा तीन टप्प्यांत ३५ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. साधारणत: दरवर्षी मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त असतात, यंदा मात्र मे ते जून दरम्यान जवळपास सव्वा महिना लग्नाचे मुहूर्त नाहीत.

उमेदवारांसाठी ही आनंदाची गोष्ट असली तरी शाळांना लागलेल्या सुट्ट्या आणि कुटुंबीयांनी केलेले ट्रिपचे नियोजन ही उमेदवारांकरिता काहीशी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर कुटुंबांकडून ट्रिपचे नियोजन केले जाते. यंदाही कुटुंबांमध्ये सुट्टीसाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. अगदी फॉरेन टूरची आखणी केली जात आहे. याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. 

यंदा निवडणुका आणि लग्न तारखा एकत्र आलेल्या नाहीत. एप्रिलनंतर थेट जूनमध्येच मुहूर्त आहेत. त्यामुळे निवडणुकांवर कोणताच फरक पडणार नाही.- मोहन दाते, पंचांगकर्ते

टॅग्स :marriageलग्न