शैक्षणिक पात्रतेची खोटी माहिती; स्मृती इराणी अडचणीत येणार
By Admin | Updated: May 31, 2014 23:06 IST2014-05-31T23:06:26+5:302014-05-31T23:06:26+5:30
इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेपुरताच मर्यादित नाही तर लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत त्यांनी तीन वेळा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत घेतलेल्या परस्पर विसंगत भूमिकेशी निगडित आहे.

शैक्षणिक पात्रतेची खोटी माहिती; स्मृती इराणी अडचणीत येणार
>फराज अहमद - नवी दिल्ली
शैक्षणिक पात्रतेशी संबंधित दस्तऐवज फोडणा:या दिल्ली विद्यापीठाच्या कर्मचा:यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केंद्रीय मनुष्य बळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलेली असली तरी 2क्क्4, 2क्11 आणि 2क्14 च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रतील विसंगतीमुळे त्यांची राजकीय पंचाईत होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा केवळ इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेपुरताच मर्यादित नाही तर लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत त्यांनी तीन वेळा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत घेतलेल्या परस्पर विसंगत भूमिकेशी निगडित आहे.
या मुद्यावर आम्ही स्वत:हून स्मृती इराणी यांच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही. परंतु अन्य कुणालाही पुढे येऊन खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल इराणी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करता येऊ शकेल. खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या आरोपात जास्तीतजास्त सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ सूत्रंनी लोकमतला सांगितले.
खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल इराणी यांना सहा महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यांना तुरुंगवास झाला तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व कायम राहील आणि त्यांना अपात्र ठरविले जाणार नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
एखाद्या लोकसभा सदस्याला दोन वषापेक्षा कमी शिक्षा झाल्यास त्याला अपात्र ठरविता येत नाही, असे कायदा सांगतो.
-स्मृती इराणी यांनी 2क्11 च्या राज्यसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रत, आपली शैक्षणिक पात्रता ‘बी. कॉम. पार्ट 1, स्कूल ऑफ करस्पाँडन्ट कोर्स, दिल्ली विद्यापीठ, 1994’ असल्याचे नमूद केले होते. त्या आधी 2क्क्4 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी, दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ करस्पाँडन्टमधून 1996 मध्ये बी. ए. झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर 2क्14 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची शैक्षणिक पात्रता पुन्हा बदलली. यावेळी त्यांनी पुन्हा बी. कॉम. पार्ट 1 असे नमूद केले.
-विशेष म्हणजे हे तिन्ही प्रतिज्ञापत्र त्यांनी शपथेवर लिहून दिलेले आहेत. आता या विसंगत प्रतिज्ञापत्रवर भाजपा आणि रालोआ काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.