शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

विश्वास जिंकला, तरी अविश्वास कायम! पुढच्या अधिवेशनातही येऊ शकतो

By अतुल कुलकर्णी | Updated: March 24, 2018 05:10 IST

विधानसभा अध्यक्षांविरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव ते अधिवेशन संपले, म्हणून कालबाह्य होत नाही. विधिमंडळ कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर सरकारने घाईगर्दीत दाखल केलेला विश्वास ठराव मंजूर झाला असला, तरी विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव कायम असून, तो पुढील अधिवेशनात चर्चेला येऊ शकतो.

मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव ते अधिवेशन संपले, म्हणून कालबाह्य होत नाही. विधिमंडळ कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर सरकारने घाईगर्दीत दाखल केलेला विश्वास ठराव मंजूर झाला असला, तरी विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव कायम असून, तो पुढील अधिवेशनात चर्चेला येऊ शकतो.१० एप्रिल १९८७ रोजी तत्कालीन अध्यक्ष शंकरराव जगताप यांच्याविरुद्ध निहाल अहमद यांनी अविश्वास ठराव आणला होता. तो पावसाळी अधिवेशनात म्हणजे, २५ जून १९८७ रोजी अनुमतीसाठी मांडण्यात आला व त्याच दिवशी चर्चा व मतदान होऊन तो फेटाळला गेला होता. दुसरे उदाहरण २० एप्रिल २००० रोजीचे आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी अरुण गुजराथी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. तो २८ जुलै रोजी म्हणजे दुसऱ्या अधिवेशनात अनुमतीसाठी मांडला गेला, पण प्रस्तावाच्या बाजूने एकही सदस्य उभा न राहिल्यामुळे तो प्रस्ताव बारगळा गेला. हरिभाऊ बागडे यांच्यावर आणलेल्या अविश्वास ठरावावर अध्यक्षांनी योग्य वेळी निर्णय देऊ, असे जाहीर केले होते. तर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यावर लवकरच चर्चा करू सांगितले होते. असे असताना सरकारने घाईगर्दीत अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव शुक्रवारी मांडला आणि गदारोळात आवाजी मतदानाने मंजूर करून घेतला. असे असले, तरी आधीच्या अविश्वास ठरावावर निर्णयच झालेला नसल्यामुळे तो ठराव अजूनही कायम राहातो, असे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.बागडे यांच्याविरुद्ध यापूर्वीही (१९ जुलै २०१६) अविश्वास ठराव आला होता, पण विरोधकांनी आग्रह न धरल्यामुळे तो बारगळला गेला.आतापर्यंत १३ अविश्वास ठरावबागडे यांच्याविरुद्ध या आधीही अविश्वास ठराव आला होता़ आतापर्यंत १३ वेळा अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडले गेले असून, सर्वाधिक ४ वेळा तत्कालीन अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यावर अविश्वास ठराव आले होते़

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेvidhan sabhaविधानसभा