शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

फडणवीस राज्यातच राहणार

By admin | Updated: March 17, 2017 01:08 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविले जाण्याची कुठलीही शक्यता नाही. ते राज्यातच राहतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविले जाण्याची कुठलीही शक्यता नाही. ते राज्यातच राहतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. पत्रपरिषदेत ते म्हणाले की, फडणवीस यांचे सरकार स्थिर आहे. राज्याच्या प्रगतीसाठी ते झपाट्याने निर्णय घेत आहेत. अलीकडे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपाला फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले यशही मिळाले असून, त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे, असे कौतुक गडकरी यांनी केले. गोव्यामध्ये काँग्रेस पक्षात आणखी फूट पडेल, असे स्पष्ट संकेत गडकरी यांनी दिले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांनी आज आमदारकी आणि काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. हे तर ट्रेलर आहे अजून सिनेमा बाकी आहे. काय काय होते ते बघा, असे सूचक उद्गार गडकरी यांनी पत्रपरिषदेत काढले. गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन करण्यात गडकरी यांची महत्त्वाची भूमिका होती. हे सरकार जनभावना पायदळी तुडवून स्थापन झाल्याची टीका काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केली आहे. याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले की, गोव्यात आम्हाला सर्वाधिक ३१ टक्के मते मिळाली. काँग्रेसला २६ टक्के मते होती. याचा अर्थ जनभावना जास्त भाजपासोबतच होती. राजकारणात संधी महत्त्वाची असते. वेगवान हालचाली करून आम्ही सत्तेसाठीचे आवश्यक संख्याबळ मिळविले. काँग्रेसला ते करता आले नाही. आम्ही त्या ठिकाणी पाच वर्षे स्थिर सरकार देऊ. स्वत:चे आमदारही सांभाळू न शकलेली काँग्रेस आता निराशेपोटी आमच्यावर आरोप करीत आहे. लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे; पण शिवसेनेच्या उमेदवारांना सर्व मिळून गोव्यात ७५० मते मिळाली, असा चिमटा गडकरींनी काढला. (विशेष प्रतिनिधी)