शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

फडणवीस राज्यातच राहणार

By admin | Updated: March 17, 2017 01:08 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविले जाण्याची कुठलीही शक्यता नाही. ते राज्यातच राहतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविले जाण्याची कुठलीही शक्यता नाही. ते राज्यातच राहतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. पत्रपरिषदेत ते म्हणाले की, फडणवीस यांचे सरकार स्थिर आहे. राज्याच्या प्रगतीसाठी ते झपाट्याने निर्णय घेत आहेत. अलीकडे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपाला फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले यशही मिळाले असून, त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे, असे कौतुक गडकरी यांनी केले. गोव्यामध्ये काँग्रेस पक्षात आणखी फूट पडेल, असे स्पष्ट संकेत गडकरी यांनी दिले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांनी आज आमदारकी आणि काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. हे तर ट्रेलर आहे अजून सिनेमा बाकी आहे. काय काय होते ते बघा, असे सूचक उद्गार गडकरी यांनी पत्रपरिषदेत काढले. गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन करण्यात गडकरी यांची महत्त्वाची भूमिका होती. हे सरकार जनभावना पायदळी तुडवून स्थापन झाल्याची टीका काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केली आहे. याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले की, गोव्यात आम्हाला सर्वाधिक ३१ टक्के मते मिळाली. काँग्रेसला २६ टक्के मते होती. याचा अर्थ जनभावना जास्त भाजपासोबतच होती. राजकारणात संधी महत्त्वाची असते. वेगवान हालचाली करून आम्ही सत्तेसाठीचे आवश्यक संख्याबळ मिळविले. काँग्रेसला ते करता आले नाही. आम्ही त्या ठिकाणी पाच वर्षे स्थिर सरकार देऊ. स्वत:चे आमदारही सांभाळू न शकलेली काँग्रेस आता निराशेपोटी आमच्यावर आरोप करीत आहे. लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे; पण शिवसेनेच्या उमेदवारांना सर्व मिळून गोव्यात ७५० मते मिळाली, असा चिमटा गडकरींनी काढला. (विशेष प्रतिनिधी)