शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

फडणवीस-ठाकरे वादामुळे राज्यातील सत्तेचे चित्र बदलले - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 02:47 IST

मुख्यमंत्रीपद वाटपाचा प्रस्ताव अमित शहांनी नाकारला

कोल्हापूर : राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे सत्तेचे चित्र बदलले, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.आठवले म्हणाले, की ठाकरे व फडणवीस या दोघांतील वाद फारच ताणल्यामुळे आपले सरकार येणार नाही याची मला जाणीव झाल्यानंतर मी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो. भाजपने तीन वर्षे मुख्यमंत्रिपद घ्यावे तर उर्वरित दोन वर्षे शिवसेनेला द्यावे, असा पर्याय मी त्यांना दिला. परंतु, फडणवीस यांनी अजित पवार व त्यांचे अनेक आमदार आपणाला पाठिंबा देणार असल्याचे शहा यांना अगोदरच सांगून ठेवले होते. त्यामुळे शहा यांनी माझा प्रस्ताव मानला नाही.मी आशावादी आहे. शिवसेनेला पुन्हा परत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तीन पक्षांचे सरकार आता सत्तेत आल्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होणार आहेत आणि त्यातूनच सरकार पडेल, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Athawaleरामदास आठवले