शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

फडणवीसांचे 'माजी मुख्यमंत्री'पद अल्पकाळ; भैय्याजी जोशींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 14:28 IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर उद्धव यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले. मात्र त्यांची ही भेट आणि कायद्याला दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला मतदारांनी बहुमत न दिल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेना-भाजप युतीत लढल्यामुळे सरकार स्थापन करण्यात अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने राष्ट्रवीदी- काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार लवकरच कोसळणार भविष्यवाणी भाजप नेत्यांकडून नेहमीच करण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी असंच वक्तव्य केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

भाजपला दूर ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील, अशी धारणा भाजप नेत्यांची आहे. फडणवीस यांच्याकडे सध्या विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचवेळी त्यांच्या नावाचे मागे माजी मुख्यमंत्री हे बिरुद लागले. मात्र 'माजी मुख्यमंत्रीपद' हे बिरुद फडणवीसांच्या नावामागे फार काळ राहणार नाही. हे पद त्यांच्या आयुष्यात अल्पकाळ राहिल, असं भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते, असा अंदाज भाजपच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत व्यक्त केला आहे. तसेच सरकार कोसळले की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही सांगण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक जोशी यांनीच ही शक्यता वर्तविल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

उद्धव ठाकरेंच्या मोदी भेटीची चर्चामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर उद्धव यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले. मात्र त्यांची ही भेट आणि कायद्याला दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना पुन्हा भाजपच्या जवळ तर जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.