शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

फडणवीसांचे 'माजी मुख्यमंत्री'पद अल्पकाळ; भैय्याजी जोशींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 14:28 IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर उद्धव यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले. मात्र त्यांची ही भेट आणि कायद्याला दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला मतदारांनी बहुमत न दिल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेना-भाजप युतीत लढल्यामुळे सरकार स्थापन करण्यात अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने राष्ट्रवीदी- काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार लवकरच कोसळणार भविष्यवाणी भाजप नेत्यांकडून नेहमीच करण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी असंच वक्तव्य केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

भाजपला दूर ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील, अशी धारणा भाजप नेत्यांची आहे. फडणवीस यांच्याकडे सध्या विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचवेळी त्यांच्या नावाचे मागे माजी मुख्यमंत्री हे बिरुद लागले. मात्र 'माजी मुख्यमंत्रीपद' हे बिरुद फडणवीसांच्या नावामागे फार काळ राहणार नाही. हे पद त्यांच्या आयुष्यात अल्पकाळ राहिल, असं भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते, असा अंदाज भाजपच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत व्यक्त केला आहे. तसेच सरकार कोसळले की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही सांगण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक जोशी यांनीच ही शक्यता वर्तविल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

उद्धव ठाकरेंच्या मोदी भेटीची चर्चामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर उद्धव यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले. मात्र त्यांची ही भेट आणि कायद्याला दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना पुन्हा भाजपच्या जवळ तर जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.